Water Shortage Saam tv
महाराष्ट्र

Water Shortage : टंचाईच्या झळा; संभाजीनगर जिल्ह्यातील विहिरींनी गाठला तळ, फळबागा वाळू लागल्या

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने संभाजीनगर जिल्ह्यात दुष्काळाच्या प्रचंड (Sambhajinagar) झळा जाणवू लागल्या आहेत. आता विहिरीने देखील तळ गाठला आहे. यामुळे आता पाणीटंचाईचा (Water Scarcity) सामना करावा लागत असून फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. (Breaking Marathi News)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागा लागवड केली आहे. मात्र यंदा पुरेसा पाऊस (Rain) न झाल्याने पाण्याची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे आता या फळबागा कशा वाचव्यात हा मोठा प्रश्न (Farmer) शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. दरम्यान काही शेतकऱ्यांनी पाण्या अभावी फळबागांवर कुऱ्हाड सुद्धा चालवली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बाग वाचविण्यासाठी उपाय 

जिल्ह्यात पाण्याची समस्या जाणवू लागल्याने शेतकरी आपल्या फळबागा वाचविण्यासाठी विविध उपाय योजना करीत आहेत. शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट उभे राहिले असल्याने मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परिणामी शेतकरी चिंतेत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 18: ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉस हिंदीच्या घरात धमाकेदार एन्ट्री, जाणून घ्या १६ सदस्यांची नावे

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडूंवर 'प्रहार', बच्चू कडूंचा आमदार शिंदेंच्या गळाला

Suraj Chavan: बिग बॉस जिंकल्यानंतर 'सूरज'च्या गावात फटाक्यांची आतीशबाजी, गावकऱ्यांनी केली स्वागताची जंगी तयारी

Bigg Boss Winner Suraj Chavan: बिग बॉस मराठीचा विजेता ठरला सूरज चव्हाण; सुप्रिया सुळेनीं केलं अभिनंदन, म्हणाल्या जनतेच्या हृदयात...

Tirupati Balaji Prasad : तिरुपती बालाजीच्या प्रसादात आढळले किडे?, याआधी लाडूत आढळलेली प्राण्याची चरबी

SCROLL FOR NEXT