Students Refund Exam Fee Saam tv
महाराष्ट्र

Students Refund Exam Fee : दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क मिळणार परत; बँक खात्यात जमा होणार रक्कम

Sambhajinagar News : सध्या दहावीच्या परीक्षा अंतिम टप्प्यात असून बारावीच्या परीक्षा देखील सुरु आहेत. त्याचवेळी परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परत करण्याबाबत एक पत्र काढले आहे

Rajesh Sonwane

रामू ढाकणे 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती आहे. यामुळे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील (Sambhajinagar) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांचे परीक्षेच शुल्क परत मिळणार आहे. विद्यार्थ्यांनी भरलेले हे शुल्क संबंधित (Student) विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहे. (Latest Marathi News)

सध्या दहावीच्या परीक्षा (SSC Exam) अंतिम टप्प्यात असून बारावीच्या परीक्षा (HSC Exam) देखील सुरु आहेत. त्याचवेळी परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परत करण्याबाबत एक पत्र काढले आहे. यंदा राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यामुळे सरकारने नोव्हेंबर महिन्यात १५ जिल्ह्यातील ४० तालुके आणि १ हजार २१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला होता. या भागातील विद्यार्थ्यांना हे शुल्क माफ करण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुख्याध्यापकांकडून मागविली माहिती 

संबंधित भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीची सवलत लागू करण्यात आली होती. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सर्व मुख्याध्यापकांकडून पात्र विद्यार्थ्यांच्या याद्यांसह बँक खात्याची देखील माहिती मागवली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्यावर त्यांच्या खात्यावर परीक्षा शुल्काच्या प्रतिकृतीची रक्कम जमा करण्यात येईल. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; कोणत्या भागातला पाणीपुरवठा राहणार बंद?

Maharashtra Live News Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ कोपरगावमध्ये होणार मुख्यमंत्र्यांची सभा

Election Commission : निवडणूक यादीतील घोळाची सत्ताधाऱ्यांना झळ; विरोधीपक्षानंतर भाजपने घेतली हरकत, नेमकं काय घडलं?

Dr Gauri Gajge Case: डॉ. गौरी गर्जे यांची आत्महत्या की हत्या? शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती उघड

Mangalsutra Importance: काळा रंग अशुभ मानतात, तरीही मंगळसूत्राचे मणी काळे का असतात?

SCROLL FOR NEXT