Primary School Time Saam tv
महाराष्ट्र

Primary School Time : राज्यात थंडीचा जोर वाढला; आता चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊला भरणार, कुणी दिला आदेश?

Sambhajinagar News : मागील आठवड्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. मागील चार- पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून पुढील दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

डाॅ. माधव सावरगावे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात थंडीचा कडाका वाढल्याने सकाळी सकाळी सगळ्यांनाच हुडहुडी भरू लागली आहे. त्यात सकाळी सातला शाळा असल्याने मुलांना थंडीतच शाळेत जावे लागत असते. दरम्यान सकाळच्या थंडीमध्ये लहान मुलांना होणारा त्रास लक्षात घेऊन चौथीपर्यंतचे वर्ग आता सकाळी नऊ वाजता भरविण्यात यावेत; असे आदेश संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांना दिले आहेत.

मागील आठवड्यात कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. मागील चार- पाच दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी झाली असून पुढील दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या कडाक्याच्या थंडीत मुलांना शाळा गाठावी लागत आहे. त्यांना शाळेत पाठवण्याची तयारी करण्यासाठी पालकांनाही पहाटे पाच वाजताच उठावे लागत आहे. शाळा सकाळी भरावी अशी पालकांची अपेक्षा होती.

मात्र शाळांच्या वेळा बदलण्याबाबत प्रशासनाने लक्ष दिले नव्हते. मुलांनी नियमित शाळेत यावे; यासाठी त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे शाळेची वेळ ही छोट्या मुलांसाठी सकाळी नऊनंतरच असावी. अशा कुडकुडणाऱ्या थंडीत शाळेत जात असलेल्या मुलांची चिंता पालकांना लागल्यानं पालक आणि थेट शिक्षण विभागाला विनवणी करण्यात आली होती.

आदेशाचे पालन न केल्यास कारवाई 

त्यानुसार आता छत्रपती संभाजीनगरच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळा - संस्थाचालकांना सूचना करीत सकाळी नऊ नंतर शाळा भरवा असे आदेश काढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील सर्व पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी नऊ किंवा नऊनंतर भरवण्यात यावेत, असे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिल्या आहेत. महापालिकेचे शिक्षणाधिकारी आणि पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. आदेशाचे पालन न केल्यास कारवाई करण्यात येणार आहे. 

राज्यात नियम लागण्याची शक्यता 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी हे पत्र काढल्यानंतर आता राज्यातील इतर ठिकाणीही त्याचप्रमाणे शिक्षण पत्र काढण्याची शक्यता दिसते आहे. कारण येणाऱ्या काही काळामध्ये थंडीचा कडाका अधिक वाढू शकतो; अशी सध्याची स्थिती आहे. किमान थंडीच्या दिवसांमध्ये सकाळी नऊ नंतर शाळा सुरू ठेवल्या, तर मुलांना त्रास कमी होईल. शिवाय मुलं आजारी पडणार नाहीत असं पालकांचे मत आहे आता त्यावरूनच शिक्षण विभागाने पत्र काढले आहे.काळी किमान तासभर उशिरा भरवण्यात यावी, असे विद्यार्थी पालकांना वाटते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

SCROLL FOR NEXT