Kashedi Tunnel Closed For 15 Days Saam Tv
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा १५ दिवसांसाठी बंद, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Kashedi Tunnel Closed For 15 Days: रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने बोगदा बंद राहणार आहे.

Priya More

अमोल कलये, रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात १५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलादपुरजवळ भोगाव याठिकाणी पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बोगद्यातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा बोगदा मागील वर्षी गणपतीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

कशेडी बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे ही वाहतूक सध्या जुन्या घाट मार्गावरून वळवण्यात आली आहे. जुन्या घाट मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितलं. कशेडी बोगदा बंद करण्यात आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्ग पाहूनच प्रवास करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

SCROLL FOR NEXT