रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले
Jagbudi River News Saam Tv
महाराष्ट्र

Ratnagiri News: रत्नागिरीत जगबुडी नदीत पाच जण बुडाले

साम टिव्ही ब्युरो

अमोल कलये, साम टीव्ही, प्रतिनिधी

खेड तालुक्यातील तुंबाड येथे जगबुडी नदीत पाच जण बुडाल्याची घटना घडली आहे. तुंबाड येथे पोहायला गेलेल्या पाच जणांपैकी दोघांचा यात बुडून मृत्यू झालाय. यातील तिघांना वाचविण्यात यश आलंय.

सौरभ हरिश्चंद्र नाचरे ( वय - १९, पन्हाळजे ), अंकेश संतोष भागणे (वय -२०, बहिरवली- मधली वाडी) अशी दोघा मृतांची नावं आहेत. आज दूपारनंतर सौरभ, अंकेश, यांच्यासह अभय पांडुरंग भागणे, महेश मारुती गमरे, मयंक प्रकाश बाणाईत असे पाच जण तुंबाड इथल्या जगबुडी नदीपात्रात पोहायला गेले होते.

यादरम्यान पाचही जणांनी नदीत पोहण्याच्या निमीत्ताने नदीमध्ये उड्या मारल्या. नेमक भरतीच्या दरम्यानची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही.

तिथेच एका मासेमारी करणाऱ्या नावाड्याने तीघांना वाचवले. मात्र सौरभ आणि अंकेश हे भरतीच्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात सापडल्याने ते बोटीपर्यंत पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे ते मृत्युमुखी पडले. स्थानिक ग्रामस्थांनी नंतर त्या दोघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले. या घटनेची माहिती समजताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, मृत सौरभ हा वायरमन म्हणून काम करत होता. तर अंकेश भागणे मुंबई येथे एका बेकरीमध्ये कामाला होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पन्हाळजे - बहिरवली पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : रत्नागिरी - चिपळूणच्या कालुस्ते घाटात कोसळली दरड

Chhatrapati Sambhajinagar : भरधाव कारने दुचाकीला उडवलं; पती पत्नीचा जागीच मृत्यू, कारचालक फरार

Kalyan News: नदीवर फूले टाकण्यासाठी गेली अन् पडली; पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेला मिळालं जीवनदान

Manoj Jarange Video : चंद्रकांत पाटलांनी सरकारची सुपारी घेऊ नये, ओबीसीतून आरक्षण घेणारच; परभणीत मनोज जरांगे कडाडले

IND vs ZIM 2nd T20 : भारताने काढला पराभवाचा वचपा; झिम्बॉब्वेच्या गोलंदाजांची तुफान धुलाई, २३४ धावा चोपल्या

SCROLL FOR NEXT