महाराष्ट्र

सरपंचबाईंच्या पतीराजांनीच चोरले पाणी योजनेचे पाईप

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कर्जत तालुक्यात राशीन ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. ही ग्रामपंचायत आपल्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय नेत्यांचा अट्टहास असतो. देशमुख आणि राजेभोसले गटात येथे नेहमीच चढाओढ असते. या ग्रामपंचायतीवर देशमुख गटाच्या नीलम साळवे या सरपंच आहेत.

ही ग्रामपंचायत वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. कर्जत-राशीन संयुक्त पाणीयोजनेचे पाइप चोरीला गेले आहेत. त्या प्रकरणाच्या तपासात सरपंच पतींचे नाव समोर आल्याने गहजब सुरू आहे. या बाबत विरोधी राजेभोसले गटाचे नेते राम कानगुडे व विक्रम राजेभोसले यांनी पत्रकार परिषद घेऊन तसे आरोप केले आहेत. यावेळी माजी उपसरपंच शाहू राजेभोसले, तात्यासाहेब माने, अशोक जंजिरे आदी उपस्थित होते. Rashin's sarpanch's husband accused of theft

कानगुडे व राजेभोसले पत्रकारांशी बोलताना म्हणाले, जितेंद्र गजरमल व प्रल्हाद साळवे या आरोपींना अटक झाली आहे. त्यांनी सरपंच नीलम साळवे यांचे पती भीमराव साळवे हे मुख्य सूत्रधार असल्याचा कबुलीजबाब दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ही जनतेची फसवणूक आहे. अशा स्वरूपाचे पत्रक ग्रामपंचायत सदस्य हर्षदा जंजिरे, अॅड. युवराज राजेभोसले, बापू उकिरडे, जनाबाई सायकर यांनी काढले आहे.

सरपंच साळवे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. कोणत्या ना कोणत्या प्रकरणात अडकवून माझे पद त्यांना घालवायचे आहे. परंतु त्यांना यात यश मिळणार नाही. आणि राजीनामाही देणार नाही.Rashin's sarpanch's husband accused of theft

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआनं सरकारला पाठवलं 15 प्रश्नांचं पत्र; उत्तर देण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी काढल्या शुद्धलेखनाच्या चुका

चड्डी बनियान गँग, त्यांनी त्यांची अब्रू वेशीला टांगलीय; एकनाथ शिंदे का भडकले? पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

लाडकी बहीण योजना, अजितदादांची आठवण, महाराष्ट्राचा विकास; अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री बदलणार? आमदार एकवटले म्हणाले आम्हाला बदल पाहिजे; 26 फेब्रुवारीला हायकमांड दिल्लीत निर्णय देणार

SCROLL FOR NEXT