Monsoon Saam TV
महाराष्ट्र

Monsoon: पुण्यात रेड अलर्ट, तर मुंबईत मुसळधार पाऊस कोसळणार; पुढील ४ दिवस धोक्याचे, हवामान विभागाने काय इशारा दिला?

Maharashtra Weather Update: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूर्वमान्सूनने हजेरी लावली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

Bhagyashree Kamble

गेल्या काही दिवसांपासून राज्यात पूर्वमान्सूनने हजेरी लावली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, मात्र याचा शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचे चित्र आहे.

हवामान विभागाने पुणे जिल्ह्यासाठी 'रेड अलर्ट' जारी केला असून, मुंबईसह अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील ४ दिवस राज्यात मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पुणे

पुणे जिल्ह्यासाठी हवामान विभागाने आज 'रेड अलर्ट' जारी केला आहे. पुढील ३ ते ४ तासांच्या कालावधीत जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ५० ते ६० किमी/तास वेगाने वारे, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही माहिती मंत्रालयाच्या 'सचेत' अ‍ॅपवरून अधिकृतरीत्या प्राप्त झाली आहे.

मुंबई

मुंबईत रात्रभर दमदार पावसानंतर सध्या वातावरणात थोडी विश्रांती मिळाली आहे. शहर आणि उपनगरांमध्ये आता ढगाळ हवामान असून, हवेत गारवा जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संध्याकाळनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता आहे. ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घराबाहेर पडताना योग्य काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्यभरात कुठे बरसणार पाऊस

पुढील ४ दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २२ मे (गुरुवार) ते २५ मे (रविवार) दरम्यान महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

कोकण व पश्‍चिम महाराष्ट्र: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भ: नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक

मध्य महाराष्ट्र व मराठवाडा: पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छ.सं. नगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी

तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी या जिल्ह्यांत पावसाचा प्रभाव २६ मे (सोमवार) पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र पावसाचा जोर तुलनेने कमी राहील, फक्त काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

अवकाळी पावसाचं हे वातावरण किती दिवस राहील?

हवामान अंदाजानुसार, ३१ मेपर्यंत महाराष्ट्रात पावसाचे वातावरण राहू शकते. मात्र, २९ मेपासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. मान्सूनचं केरळमधील आगमन कधी होते, यावर पुढील हवामानाचा अंदाज ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी..., लाडक्या बाप्पाला आज निरोप

Jio Recharge Plan: ७५ रुपयांचा जिओचा प्रीपेड प्लॅन! २३ दिवसांची वैधता, अतिरिक्त डेटा मोफत अन् बरंच काही...

IPS Anjana Krishna: आई टायपिस्ट, वडील कपडे विकायचे, एकेकाळी डिप्रेशनमध्ये गेल्या, तरी जिद्दीने झाल्या IPS, वाचा अंजना कृष्णा यांचा प्रेरणादायी प्रवास

Saturday Horoscope: आनंदाचा दिवस; अनंत चतुर्दशीच्या दिवशी ६ राशींना होणार धनलाभ, जाणून घ्या तुमचं राशीभविष्य

Airtel: घरात वाय-फाय समस्या? फक्त ९९ रुपयांमध्ये घरभर हाय स्पीड इंटरनेट

SCROLL FOR NEXT