Political News  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचा दबदबा; उद्धव-राहुल भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणांची चिन्हे

Maharashtra Politics : दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची ३५ मिनिटांची बैठक झाली असून ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चांना वेग आला आहे.

Alisha Khedekar

  • उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची दिल्लीमध्ये 35 मिनिटांची बैठक पार पडली.

  • ठाकरे बंधूंच्या युतीबाबतच्या चर्चांना बैठकीनंतर नवे वळण आले.

  • बैठकीतील मुद्द्यांची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची चिन्हे स्पष्ट.

गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचीच चर्चा सुरु आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी पंतप्रधानांची तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब राहुल गांधींची दिल्लीत भेट घेतली. उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत आता दिल्लीत निर्णय होणार असल्याची चर्चा रंगली.

त्यात उद्धव ठाकरें आणि राहुल गांधी यांची जवळपास ३५ मिनटे चर्चा झाल्यानं तर्कविर्तक सुरू झाले आहेत. या बैठकीतल्या चर्चेबाबत कुठलीच माहिती समोर आलेली नसली तरी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंमध्ये झालेल्या बैठकीत कुठल्या मुद्द्यावर चर्चा झाली असावी पाहा.

राहुल गांधीसोबतच्या बैठकीत राज ठाकरेंसोबतच्या युतीवर चर्चा झाल्याच जरी म्हटलं जात असल तरी उद्धव ठाकरेंनी याआधीच युतीच्या निर्णयाबाबत सुतोवाच केलं आहे. एकूणच उध्दव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या अर्ध्या तासाच्या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Afghanistan Pakistan Tension: अफगाणिस्तानने थोपटले दंड; पाकिस्तानच्या संरक्षणमंत्री आणि ISI प्रमुखांना व्हिसा देण्यास नकार

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांची महाष्ट्राच्या राजकारणात होणार एन्ट्री? कोण काय म्हणालं? वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Crime: नाशिक जिल्हा....; पुस्तकांऐवजी बॅगेत कोयता अन् चॉपर, महाविद्यालीन विद्यार्थ्यांमध्ये भाईगिरीचे फॅड

Hindu Festivals: रक्षाबंधन आणि भाऊबीजमध्ये काय फरक आहे?

Virat Kohli : लिलावापूर्वी करार करण्यास नकार, IPL 2026 मध्ये विराट कोहली RCB कडून खेळणार की नाही?

SCROLL FOR NEXT