Maharashtra Political News, Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde SAAM TV
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis : गणेशोत्सवापूर्वीच महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?, दिग्गज नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Political News : राज्य सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असून, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून नाराजीनाट्य वाढल्याचे विरोधकांकडून वारंवार बोलले जात आहे.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Maharashtra Political News : राज्य सरकारमध्ये अंतर्गत नाराजी असून, अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून नाराजीनाट्य वाढल्याचे विरोधकांकडून वारंवार बोलले जात आहे. राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू असतानाच, येत्या १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात बदल होईल, असा दावा काँग्रेस नेत्यानं केला आहे. या दाव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

राज्यात भाजप-शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट सत्तेत आहे. या सरकारमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू असल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. विशेषतः अजित पवार हे सत्तेत सहभागी झाल्यापासून नाराजीनाट्य वाढल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही विरोधक करत आहेत.

सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही मोठा दावा केला आहे. कधी पुण्याचे, तर कधी नागपूरचे उपमुख्यमंत्री दांडी मारतात. तिघे जण कधीही एकत्र येत नाहीत. दोन उपमुख्यमंत्री एकत्र आले तर, मुख्यमंत्री येत नाहीत. हे जे काही राज्यात सुरू आहे, त्यावरून आलबेल आहे की नाही हे स्पष्ट दिसत आहे. हा सगळा तमाशा, नाटक महाराष्ट्राला दिसत आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

सत्तेसाठी सर्व काही सुरू आहे. येत्या काही दिवसांत म्हणजे १५ ते २० दिवसांत महाराष्ट्रात बदल होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. मुख्य खुर्चीपासून बदलाला सुरुवात होईल. सप्टेंबरमध्ये सत्ताबदल होईल. याचा अर्थ आमची सत्ता येईल असा नाही, पण मुख्य खुर्ची नक्की बदलेल हे ठासून सांगतोय, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.

शेतकरी प्रश्नांवरूनही सरकारवर टीकास्त्र

यावेळी वडेट्टीवार यांनी शेतकरी प्रश्नांवरून सरकारवर टीकास्त्र सोडलं. राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली. पावसाच्या दडीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होईल. काही जिल्ह्यांत कोरडा दुष्काळ पडेल, अशी स्थिती आहे. सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT