Jayakwadi Dam Saam tv
महाराष्ट्र

Jayakwadi Dam : जायकवाडीतून दुसऱ्या आवर्तनाला विलंब; रब्बीसह उन्हाळी हंगामासाठी शेतकऱ्यांना पाण्याची प्रतीक्षा

राजेश काटकर

परभणी : पाथरी तालुक्यात जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून रब्बी हंगामासाठी दोन पाणी (Parbhani) आवर्तनाचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येते. यंदा मात्र अद्याप दुसरे आवर्तन सोडण्याच्या कोणत्याच हालचाली नसल्याने शेतकऱ्यांना (Farmer) पाण्याची प्रतीक्षा लागली आहे. (Tajya Batmya)

जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) डाव्या कालव्यातून दरवर्षी दोन वेळेस आवर्तन सोडण्यात येत असते. या पाण्याच्या आवर्तनामुळे शेतकरी रब्बीच्या पिकांसह (Rabi Crop) उन्हाळी पीक लागवडीचे नियोजन करून पेरणी करत असतात. यंदा पहिले आवर्तन नोव्हेंबर २०२३ मध्ये सोडण्यात आले. मात्र अद्यापही दुसऱ्या पाणी आवर्तनाचे नियोजन करण्यात आले नसल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसू लागला असून उन्हाळी हंगामातील उसालाही पाण्याची आवश्यकता भासणार आहे.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जायकवाडीत पाणीसाठा कमी 

रब्बी हंगामातील पिकांना पाणी सोडण्यासाठी कालवा सल्लागार समितीची मंजुरी आवश्यक असते. मात्र अद्यापही कालवा सल्लागार समितीची बैठक न झाल्यामुळे पाणी कधी सुटणार हा प्रश्न आहे. जायकवाडी धरणात पाणी कमी असल्याने अरबीचे दूसरे आवर्तन सुटते की नाही, याबाबत शेतकन्यांमध्ये चिता व्यक्त केली जाऊ लागली आहे. त्यामुळे पिकांना दुसरे आवर्तन कधी सोडणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT