farmer Saam TV
महाराष्ट्र

Beed News: कांद्याला भाव नसल्यानं कर्ज कसं फेडणार? आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्यानं जीवन संपवलं

बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे ही घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

बीड : कांद्याला मिळत असणाऱ्या कवडीमोल भावाने पुन्हा एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा बळी घेतलाय. कांद्याला भाव नाही, मग पैसे येणार कसे? पतसंस्थेचे घेतलेले कर्ज फेडणार कसे? आता जगायचं कसं? या विवंचनेत असलेल्या 42 वर्षीय शेतकऱ्याने, गळफास घेऊन आत्महत्या केली. बीडच्या आष्टी तालुक्यातील अंभोरा येथे ही घटना घडली आहे. कांतीलाल नारायण गवळी असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

शेतकरी कांतीलाल गवळी यांनी आपल्या दोन एकर शेतात कांदा लागवड केली होती. यासाठी त्यांना मोठा खर्चही आला. आता चांगला भाव लागला तर आपल्या डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी होईल, असं त्यांना वाटत होतं.

मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे आपण घेतलेले कर्ज कसं फेडावं? या विवंचनेतून शेतकरी कांतीलाल गवळी यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान यामुळे पुन्हा एकदा शेतमालाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये असलेल्या नैराश्येचं वास्तव समोर आलं आहे. यामुळे मायबाप सरकारने शेतमालाच्या हमीभावावर तोडगा काढावा. शेतकऱ्यांना मानाने जगता येईल तेवढा तरी शेतमालाला भाव द्यावा. तरचं शेतकऱ्यांच्या अडचणी कमी होतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT