Samruddhi Mahamarg Saam tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg: एका वर्षाची समृद्धी! ५५ लाख वाहने, ४२५ कोटी महसूल; अपघात अन् मृत्यूंचा आकडा धडकी भरवणारा; स्पेशल रिपोर्ट

Gangappa Pujari

संजय जाधव, बुलढाणा| ता. १० डिसेंबर २०२३

One Year Report Card Of Samruddhi Mahamarg:

वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत असणाऱ्या समृद्धी महामार्गाला आज एक वर्ष पुर्ण झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प अशी या महामार्गाची ओळख आहे. मात्र वारंवार होणाऱ्या अपघातांमुळेच हा महामार्ग चर्चेत राहिला. समृद्धीच्या वर्षपुर्तीनिमित्त जाणून घ्या त्याचं संपूर्ण रिपोर्ट कार्ड.

११ जिल्ह्यांमधून जाणारा ५५ हजार कोटींचा प्रकल्प..

नागपूर ते मुंबई (Nagpur to Mumbai) असा ७०१ किलोमीटरचा जागतिक दर्जाच्या असलेला हा महामार्ग ५५ हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. हा महामार्ग सध्या ६०० किलोमीटर सुरू असून शेवटचा १०० किलोमीटरचा टप्पा अजूनही निर्माणाधिन आहे.

५५ लाख वाहने धावली...

गेल्या वर्षभरात या महामार्गावरून (Samruddhi Highway) जवळपास ५५ लाख वाहने धावलीत या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला ४२५ कोटींचा महसूलही मिळाला. राज्याच्या ११ जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग सुरू होऊन एक वर्षे पुर्ण झाले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघातामुळे चर्चेत..

समृद्धी महामार्ग सुरू होऊन आज बरोबर एक वर्ष झाले. मात्र गेल्या वर्षभरात सुरुवातीच्या काळात महामार्ग चर्चेला गेल्या तो या महामार्गावर झालेल्या अपघातांमुळे. पहिल्या सहा महिन्यात या महामार्गावर अनेक अपघात झाले. मात्र या अपघातानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महामार्ग पोलीस व परिवहन विभागाने अनेक उपाययोजना केल्यात आणि त्यामुळे गेल्या सहा महिन्यात या महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे.

अपघातांवर नियंत्रण मिळवण्यात यश..

सुरुवातीच्या काळात या महामार्गावरून वाहन चालवण्यासाठी जनजागृती नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात अनेक अपघात झाले. महामार्ग सुरू झाल्यानंतर पहिल्या सहा महिन्यात या महामार्गावर ८०० च्या वर अपघात झाले तर दुसऱ्या सहा महिन्यात या महामार्गावर फक्त अडीचशे अपघात झालेले आहेत.

बुलढाणा बस अपघाताने हादरला होता महाराष्ट्र...

वर्षभरात या महामार्गावर झालेला अपघातात 140 जणांचा मृत्यू झालेला आहे. या महामार्गावर सर्वात मोठा झालेला अपघात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा जवळ झालेला खाजगी प्रवासी बसला (Buldhana Bus Accident) अपघात या अपघातात 25 प्रवाशांचा जळून हो मृत्यू झाला होता ...

महामार्गावरील कमतरता..

समृद्धी महामार्गाने विदर्भ आणि मराठवाडा परिसरात काहीशा प्रमाणात समृद्धी आली. प्रवासाचा वेळ वाचू लागला. प्रवास सुखकारक झाला. मुंबई आणि नागपूर या दोन शहरातील अंतर कमी झालं.मात्र तरीही समृद्धी महामार्गावर अजूनही अनेक उनिवा आहेत. समृद्धी महामार्गावर अद्यापही पब्लिक अमेनिटी या सुरू झालेल्या नाहीत.

पेट्रोल पंप, सुखसुविधांचा अभाव...

पेट्रोल पंप ही मर्यादितच आहेत. प्रवासासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा मात्र या महामार्गावर अद्यापही तयार करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या एक वर्षात समृद्धी महामार्गावरून जरी 55 लाख वाहनांनी प्रवास केला असला तरी मात्र जीवित हानी ही मोठी झालेली आहे त्यामुळे या महामार्गावर आता आगामी काळात अनेक भौतिक सुविधांचा अभाव महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाला दूर करणे अपेक्षित आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT