नाशिकमध्ये बनावट पोलिस असल्याचे सांगून व्यापाऱ्याचे अपहरण
आरोपींनी २५ लाख रुपयांची खंडणी मागितली
वादाच्या दरम्यान छातीत दुखू लागल्याने मृत्यू
तीन संशयित आरोपींना अटक
अजय सोनावणे, मनमाड
Nashik Devala Road Tragedy News नाशिकमध्ये पोलिस पथक असल्याचे सांगून, गुटख्याने भरलेली पिकअप अडवून, २५ लाख रुपयांची खंडणीसाठी अपहरण करून दिलेल्या त्रासातून नाशिकच्या देवळा तालुक्यातील व्यापाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करत शिताफीने अटक केली. जब्बार तांबोळी असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबोळी हे गुजरातमधून पिकअप वाहनातून गुटखा भरून अभोणामार्गे देवळ्याकडे येत होते. या दरम्यान देवळा- कळवण रस्त्यावरील भऊर फाट्यावर काळया रंगाचे स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या तिघांनी त्यांना अडवलं. आम्ही पोलिस महानिरीक्षक पथकातील अधिकारी असल्याचे बतावणी करून २५ लाखांची खंडणी मागितली. खंडणीसाठी मृत जब्बार आणि पिक अप चालकाचे अपहरण केले.
अखेर तडजोडी अंती ११ लाख रुपये खंडणी देण्याचे ठरले. ठेंगोडा परिसरातील एका नर्सरीजवळ जब्बार यांचा मुलगा व काही ग्रामस्थ रक्कम घेऊन पोहचले. त्याचवेळी तांबोळी आणि संशयित आरोपींमध्ये बाचाबाची झाली. त्यातच जब्बार यांच्या छातीत दुखू लागले आणि ते बेशुध्द पडले. जब्बार बेशुद्ध पडल्यानंतर संशयितांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला.
दरम्यान बेशुध्द अवस्थेतील जब्बार तांबोळी यांना दवाखान्यात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी विलास जगताप, मोहम्मद शफीक मोहम्मद रफीक तसेच महेश भामरे या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांना अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.