Narayan Rane 
महाराष्ट्र

हजर नव्हे..! पत्रकारांशी अधिक न बोलता नारायण राणे निघून गेले

साम टिव्ही ब्युरो

राजेश भोस्तेकर

रायगड : हजर नव्हे..! मी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी येथे आलाे हाेताे असे सांगत केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane हे पत्रकारांशी अधिक न बोलता अलीबाग येथील पाेलिस अधीक्षक कार्यालय परिसरातून निघून गेले. आज दुपारी तीनच्या सुमारास राणे हे त्यांच्यावरील दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात पाेलिसांना तपास कार्यात सहकार्य करण्यासाठी येथे आले हाेते असे त्यांच्या वकीलांनी नमूद केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर नाशिक येथे पहिला गुन्हा नाेंद झाला हाेता. त्यानंतर पाेलिसांनी राणेंना संगमेश्वर येथे ताब्यात घेऊन महाड न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने राणेंना जामीन देताना त्यांनी ३० आॅगस्ट आणि १३ सप्टेंबरला अलीबाग पाेलिसांत हजर राहण्याची अट घातली हाेती. पहिल्या तारखेस मंत्री राणे हे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी वकीलांच्या माध्यमातून गैरहजेरीचे कारण पाेलिसांना दिले हाेते.

आज (मंगळवार, ता, १३) ते स्वतः अलीबाग पाेलिस अधीक्षक कार्यालयात हजर राहिले. त्यांचा जबाब नाेंदविण्यात आल्याची माहिती त्यांचे वकील ऍड संग्राम देसाई यांनी दिली. देसाई म्हणाले न्यायालयाच्या आदेशानुसार आज मंत्री राणे हे पाेलिस अधीक्षक कार्यालयात आले. त्यांनी तपासी अंमलदार मिलिंद खोपडे यांच्याकडे त्यांचा जबाब नोंदविला. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर दिले आहेत.

पोलिसांना पूर्ण सहकार्य नारायण राणे यांनी केले आहे. आवाज तपासणी नमुने आज घेण्यात आलेले नाहीत. नमुने लागले तर देणार आहोत. या प्रकरणी आता पुढची काेणतीही तारीख दिलेली नसल्याचे ऍड संग्राम देसाई यांनी स्पष्ट केले.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tragedy in Jalgaon: शेतकरी कुटुंबावर काळाचा घाला; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू, जबाबदार कोण?

Maharashtra Rain Live News: रस्त्यावर पार्क केलेल्या एका चार चाकी वाहनाला लागली आग

Mumbai Monorail: पावसाने केली 3 हजार कोटींच्या मोनोरेलची पोलखोल; मोनोरेल फेल का ठरली?

IAS Transfer: राज्यातील आणखी ५ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या, कोणाची कुठे झाली बदली?

Mumbai: तरुणाला शॉक, हेडफोनने केला घात; महावितरणचा निष्काळजीपणा जीवावर बेतला

SCROLL FOR NEXT