Nandurbar Lok Sabha Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha : मोबाईल आणल्यास थेट कारवाई; मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात बंदी

Nandurbar News : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. नंदुरबार जिल्ह्याकरिता देखील याच दिवशी मतदानाची प्रक्रिया होत असून त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली आहे

Rajesh Sonwane

सागर निकवाडे

नंदूरबार : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. या टप्प्यात नंदुरबार (Nandurbar) लोकसभा मतदार संघाचा समावेश असून त्यासाठी प्रशासन सज्ज झालेला आहे. उद्या होत असलेल्या मतदानादरम्यान मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल आणण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोबाईल आणल्यास थेट कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी दिले आहेत.   

लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. नंदुरबार जिल्ह्याकरिता देखील याच दिवशी मतदानाची प्रक्रिया होत असून त्या अनुषंगाने प्रशासनाने तयारी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची पूर्ण खबरदारी प्रशासनाच्या वतीने घेण्यात येत आहेत. आज सर्व मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीनसह सर्व साहित्य रवाना झाले आहे. तर निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी मतदानाच्या अनुषंगाने काही सूचना देखील दिल्या आहेत. 

पोलिसांकडून होणार तपासणी 

यातच मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदान प्रतिनिधींना देखील मोबाईल न वापरण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या आहे. पोलीस विभागाच्या माध्यमातून मतदान केंद्रावर मतदान करणाऱ्या मतदारांची देखील तपासणी केली जाणार आहे. यासोबतच मतदान केंद्रात मतदारांनी मोबाईल वापरल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा पेपर कसा फुटला? यश यादवकडे कुठून आला पेपर?

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

SCROLL FOR NEXT