Shreya Maskar
अंजनवेल किल्ला हा 'गोपाळगड किल्ला' म्हणूनही ओळखला जातो. हा रत्नागिरी जिल्ह्यात स्थित एक सागरी किल्ला आहे. हा किल्ला अरबी समुद्र आणि वाशिष्ठी नदीच्या खाडीचे मुख यांच्याकडे पाहणाऱ्या एका टेकडीवर वसलेला आहे.
१६ व्या शतकात बांधलेला हा किल्ला वाशिष्ठी नदीवरील महत्त्वाच्या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी आणि दाभोळ या मध्ययुगीन काळातील गजबजलेल्या बंदराच्या संरक्षणासाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.
अंजनवेल किल्ल्याची तटबंदी आजही भक्कम आहे. हा किल्ला आयताकृती आकाराचा आहे.
ऐतिहासिक माहितीनुसार, अंजनवेल किल्ल्याची १६ व्या शतकात विजापूर सल्तनतने याची उभारणी केली असावी असे मानले जाते.
अंजनवेल किल्ला हा अंजनवेल या पायथ्याच्या गावाजवळ असून गुहागरपासून साधारण १३-१७ किमी आणि चिपळूणपासून ५१ किमी अंतरावर आहे.
अंजनवेल किल्ल्याजवळ चिपळूण हे रेल्वे स्टेशन आहे. चिपळूण रेल्वे स्टेशनपासून तुम्ही रिक्षाने अंजनवेल गावाला पोहचा. तेथून पुढे ट्रेकने किल्ल्यावर जा.
गुहागरला गेल्यावर गुहागर बीच, वेळणेश्वर बीच, वेळणेश्वर मंदिर आणि हेदवी ही ठिकाणे आवर्जून पाहा.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.