Nandurbar News Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यात २ फेब्रुवारीला राजकीय भूकंप; राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांचा दावा

Nandurbar News : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार करण्यात येत आहे. काही जाहीर कार्यक्रम व पक्षाचे कार्यक्रम देखील नियोजित आहेत

Rajesh Sonwane

सागर निकवाडे 

नंदूरबार : राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याचा दौऱ्यावर पहिल्यांदा येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्ह्यात राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा; (NCP) राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी केला आहे.  (Live Marathi News)

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (Jalgaon) जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होत आहे. याचे उद्घटन सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार येत असून ते नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर देखील जाणार आहेत. यामुळे राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या वतीने त्यांच्या स्वागताची तयारी जोरदार करण्यात येत आहे. काही जाहीर कार्यक्रम व पक्षाचे कार्यक्रम देखील नियोजित आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजित पवार यांच्या या कार्यक्रमात जिल्ह्यातील अनेक मोठ्या राजकीय पक्षातील मोठ्या पदधिकारी यांचा प्रवेश सोहळा आणि राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा होणार आहे. यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मोठी तयारी करण्यात येत आहे. दुपारी २ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत अजित पवार जिल्ह्यात राहणार आहेत. या जिल्ह्यातून ते पक्षवाढीसाठी कुणाला सोबत घेतात आणि काय राजकीय खेळी करतात; याकडे जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT