Nandurbar news Saam tv
महाराष्ट्र

Nandurbar: नागन नदीवरील पर्यायी पूल दोनच दिवसात गेला वाहून; दहा गावांना फटका

नागन नदीवरील पर्यायी पूल दोनच दिवसात गेला वाहून; दहा गावांना फटका

दिनू गावित

नंदुरबार : नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ नागन नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. परंतु, मातीचा पूल पहिल्याच पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने नागरिकांना दळणवळणासाठी (Nandurbar News) मोठी गैरसोय निर्माण झाली होती. (Nandurbar News Heavy Rain)

नागन नदीवरील पर्यायी पुलाबाबत साम टीव्हीने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाला जागे केले होते. अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या पाहणीनंतर पुन्हा या ठिकाणी पर्यायी पूल तयार करण्यात आला होता. निकृष्ट दर्जाचा पूल दोनच दिवसात पुन्हा वाहून गेल्याने दळणवळणाची गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे (Student) विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे.

दहा गावांची गैरसोय

मोठ्या पुलाचे काम ठेकेदाराने उन्हाळ्यात अर्धवट करून काम बंद केले होते. (Rain) पावसाळ्यात पर्यायी पूल वाहून गेला, पुन्हा तयार केला तोही वाहून गेला. पर्यायी पूल तयार करताना नागरिकांनी प्रशासनाला काम मजबूत करण्याची विनंती केली. परंतु थातूरमातूर काम करून पळ काढल्याने देवळीपाडा, निमदर्डा, मोतीजीरा, पांढरफळी, पाटीलफळी, वागदी अशा दहा गावांना दळणवळणाची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. खराब काम करून शासनाची व नागरिकांची डोकेदुखी ठरणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर वरिष्ठांनी कडक कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT