सागर निकवाडे
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या नशिबी मृत्यूनंतरही वेदना संपत नसल्याचे भीषण वास्तव पाहण्यास मिळत आहे. धड रस्ते नाहीत कि अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नाही. यामुळे या आदिवासी बांधवाना कमरे इतक्या पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा काढावी लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत जीव धोक्यात असल्याचे पाहण्यास मिळाले आहे.
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोरांबा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रोजकुंड गावात ही दुर्देवी घटना समोर आली आहे. या गावानुसारच नंदुरबार जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाडे, वस्त्यांवर पुरेशा सुविधा नाहीत. रस्ते नसल्याने त्रास सहन करावा लागत असतो. तर सातपुड्याच्या पायथ्याशी असल्याने नद्यांना पूर असल्याने यातून मार्ग काढत जावे लागत असते. अशात एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी देखील नदीतून मार्ग काढावा लागत असतो.
प्रशासनाची उदासीनता
रोजकुंड या गावात नदीला पूल आणि रस्ता नसल्याने नातेवाईकांना पुराच्या पाण्यातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ आली आहे. यामुळे प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोजकुंड गावातील ग्रामस्थ नदीवर पूल आणि रस्त्यासाठी मागणी करत आहेत. मात्र त्यांची ही मागणी अजूनही पूर्ण झालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
पुराच्या पाण्यातून मार्ग
दरम्यान अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात स्मशानभूमी देखील नाही. यामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी गावाच्या बाहेर जावे लागत असते. अशात मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरु असल्याने नदी- नाल्यांना पूर आला आहे. यामुळे कमरेपर्यंत असलेल्या पुराच्या पाण्यातून मृतदेह खांद्यावर घेऊन मार्ग काढावा लागल्याचे पाहण्यास मिळाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.