Nanded Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Nanded Water Scarcity : लोहा तालुक्यातील अनेक गावात पाणी बाणी; टंचाई असताना अजूनही गावात टँकर नाही

Nanded News : कमी पावसामुळे यंदा पाण्याची समस्या सर्व दूर आहे. नांदेड जिल्ह्यात देखील पाणी टंचाईची भीषणता जाणवत असून नांदेडच्या लोहा तालुक्यात त्यांचाही समस्या अधिक तीव्र झाली

Rajesh Sonwane

संजय सूर्यवंशी

नांदेड : नांदेडच्या लोहा तालुक्यातील अनेक गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. नद्या, तलाव, कोरडे पडले असून विहिरींनीही तळ गाठला आहे. दरम्यान लोहा तालुक्यातील हर्बल या गावात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात भासत असून गावाची लोकसंख्या ४ हजाराच्यावर आहे.

कमी पावसामुळे यंदा पाण्याची समस्या सर्व दूर आहे. नांदेड जिल्ह्यात देखील पाणी टंचाईची भीषणता जाणवत असून (Nanded) नांदेडच्या लोहा तालुक्यात त्यांचाही समस्या अधिक तीव्र झाली आहे. लोहा तालुक्यातील अनेक गावात पाण्याची भीषणता तीव्र झाल्याने लांबवरून पाणी आणावे लागत आहे. यात तालुक्यातील हर्बल गावात चार किलोमीटर दूर असलेल्या एका तलावातून पाईप लाईनद्वारे पाणी आणून विहिरीत टाकण्यात येत.या विहिरीत टाकलेले पाणी अत्यंत दूषित आहे. हेच पाणी हर्बल गावातील नागरिकांना प्यावे लागत आहे. 

अजूनही टँकर नाही 

तसेच ताईबाई तांडा येथेही पाणी टंचाई (Water Scarcity) निर्माण झाली आहे. जवळपास चारशे लोकसंख्या असलेल्या या तांड्याला एकाच बोअरमधून पाणी घ्यावे लागत आहे. बोअरच्या पाण्याची पातळी कमी झालीय. त्यामुळे अनेकांना पाणीही मिळत नाही. चार किलोमीटर दूरवरून तलावातून ग्रामस्थ दुचाकीवर पाणी आणत आहेत. पाणी टंचाई असताना देखील प्रशासनाने मात्र टँकर सुरू केले नाही. टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करताहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

Maharashtra Live News Update: बिद्री साखर कारखाना कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगारवाढ लागू,

निलेश घायवळ प्रकरणात २ बड्या राजकीय नेत्यांची नावं, रोहित पवारांच्या आरोपांनी खळबळ | VIDEO

SCROLL FOR NEXT