Nagpur Food Poisoning:  Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: धक्कादायक! उपवासाचे थालीपीठ खाल्याने २० ते २५ जणांना विषबाधा; नागपुरातील घटना

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ९ मार्च २०२४

Nagpur Food Poisoning:

राज्यभरात महाशिवरात्रीच्या उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नागपूरमधूनही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरच्या त्रिमुर्तीनगरमध्ये महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाशिवरात्रीला (Mahashivratri 2024) उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली. दोन दिवसांपूर्वी 20 दुकानांतून खाण्याचा उपवास भाजणी आटा देण्यात आला होता. एका खासगी कंपनीचे (श्री जी) भाजणी पीठ खाल्याने अनेकांना उलटी, मळमळ आणि चक्करचा त्रास होऊ लागला.

या त्रासानंतर रुग्णांना विविध खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहरातील व्होकार्ड, पडोळे, अवंतीका, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे रुग्ण भरती असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फूड निर्माती कंपनीवर कारवाईला सुरवात केली आहे.

अन्न व औषध विभागाने या घटनेची दखल घेतली असून कंपनीच्या मनुफॅक्चरिंग युनिट मधील खाद्य पदार्थांच्या कच्या मालाचे नमुने तपासण्यात येत आहेत. यासाठी २० दुकानातील सॅम्पल परत मागवले आहेत. हे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT