Nagpur Food Poisoning:  Saamtv
महाराष्ट्र

Nagpur News: धक्कादायक! उपवासाचे थालीपीठ खाल्याने २० ते २५ जणांना विषबाधा; नागपुरातील घटना

Nagpur Latest News: महाशिवरात्रीला (Mahashivratri 2024) उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली.

Gangappa Pujari

पराग ढोबळे, नागपूर|ता. ९ मार्च २०२४

Nagpur Food Poisoning:

राज्यभरात महाशिवरात्रीच्या उपवासाची भगर खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. नागपूरमधूनही असाच धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नागपुरच्या त्रिमुर्तीनगरमध्ये महाशिवरात्रीला उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महाशिवरात्रीला (Mahashivratri 2024) उपवासाचे थालीपीठ खाल्याने 20 ते 25 जणांना विषबाधा झाल्याची घटना नागपूरच्या त्रिमूर्तीनगर परिसरात घडली. दोन दिवसांपूर्वी 20 दुकानांतून खाण्याचा उपवास भाजणी आटा देण्यात आला होता. एका खासगी कंपनीचे (श्री जी) भाजणी पीठ खाल्याने अनेकांना उलटी, मळमळ आणि चक्करचा त्रास होऊ लागला.

या त्रासानंतर रुग्णांना विविध खासगी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. शहरातील व्होकार्ड, पडोळे, अवंतीका, या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे रुग्ण भरती असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अन्न प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी फूड निर्माती कंपनीवर कारवाईला सुरवात केली आहे.

अन्न व औषध विभागाने या घटनेची दखल घेतली असून कंपनीच्या मनुफॅक्चरिंग युनिट मधील खाद्य पदार्थांच्या कच्या मालाचे नमुने तपासण्यात येत आहेत. यासाठी २० दुकानातील सॅम्पल परत मागवले आहेत. हे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Dutt : सोनं, लाखोंचं घड्याळ अन् बरंच काही; संजय दत्तला पाकिस्तानी चाहत्याकडून महागड्या भेटवस्तू

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Accident News : रोजा सोडला, चहा पिण्यासाठी निघाले पण वाटेतच काळाने घातला घाला, सोलापूरमध्ये २ मित्रांचा अपघाती मृत्यू

PM Ujjawala Yojana: लाडक्या बहि‍णींच्या पदरी निराशाच! गॅस सब्सिडीसाठी ४५ दिवसांची अट, अन्नपूर्णा योजनेचा निर्णय फक्त कागदावरच

Morning Walk Benefits : सकाळी फक्त अर्धा तास चालण्याचे हे फायदे वाचाल, तर आजच जिमला जाणे सोडाल

SCROLL FOR NEXT