Crime News SaamTV
महाराष्ट्र

Raigad News: नदी किनारी दुर्गंधी पसरली, ग्रामस्थांनी सुटकेस उघडला, महिलेचा कोंबलेला मृतदेह पाहून..

Womans body found in suitcase: एका सुटकेसमध्ये कोंबलेला महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करीत आहेत.

Bhagyashree Kamble

राज्यात सध्या महिला अत्याचारांवरील घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुण्यात स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर रायगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका सुटकेसमध्ये कोंबलेला महिलेचा मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. हा मृतदेह नेमका कुणाचा आहे? याचा तपास पोलीस करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील पेणमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पेणमध्ये एक अज्ञात सुटकेस सापडला. त्या सुटकेसमध्ये एका महिलेचं मृतदेह आढळला आहे. सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. दुरशेत गावाच्या हद्दीत बाळगंगा नदी किनारी हा सुटकेस सापडला.

परिसरात दुर्गंधी पसरल्यानं ग्रामस्थांनी तपासणी केली. तेव्हा अज्ञात सुटकेस आढळला. अज्ञात सुटकेस उघडून पाहिल्यानंतर ग्रामस्थांना धक्काच बसला. सुटकेसमध्ये मृतदेह आढळल्यानं ग्रामस्थांनी थेट पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस थेट गावात दाखल झाले. या प्रकरणी पेण पोलिस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे.

सुटकेसमधील महिलेचे वय ३०-४० असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून, ५-७ दिवसांपूर्वी महिलेची हत्या झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT