राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी Saam Tv
महाराष्ट्र

राज्यातील 'या' जिल्ह्यांना पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

हवामान विभागाणं हा अंदाज वर्तवला असून ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान राज्यात पाऊस जोर धरणार आहे.

वृत्तसंस्था

मुंबई: राज्यात (Maharashtra) उद्यापासून सलग तीन दिवस पाऊसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाणं हा अंदाज वर्तवला असून ४ ते ६ सप्टेंबर दरम्यान राज्यात पाऊस जोर धरणार आहे. मागच्या काही काळात पावसाची अनियमितता पाहायला मिळाली होती. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाअभावी पिक जळून चालले होते. त्याचबरोबर मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.

राज्यात आज बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम, अमरावतीमध्ये यलो अर्लट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. तर उद्या बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापुर, सांगली आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबरसाठी हवामान विभागानं पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

६ सप्टेंबरला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापुरसह, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पावसाती शक्यता आहे. त्यामुळे यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान पुढील चार ते पाच दिवसात बंगालच्या उपसागरात कमी हवेच्या दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता असल्याने पुन्हा मान्सून सक्रिय होईल, अशी माहिती मुंबई प्रादेशिक हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: खुशखबर! कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ४११६ पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Local Body Election : काँग्रेस जिल्हाअध्यक्षाचे अपहरण अन् मारहाण, VIDEO ने महाराष्ट्रात खळबळ, हिंदुत्ववादी संघटनेवर आरोप

WTC Points Table: गुवाहाटी टेस्टमधील पराभव टीम इंडियाला पडणार महागात, WTC पॉईंट्स टेबलमध्ये होणार घसरण, पाहा समीकरण

Mahayuti: अजित पवारांच्या आमदाराकडून काँग्रेसचा प्रचार, महायुतीतील संघर्ष टोकाला

Chanakya niti: दुपारच्या वेळेस का झोपू नये? चाणक्यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण

SCROLL FOR NEXT