राजनाथसिंह यांचे वक्तव्य म्हणजे अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार : मिटकरी
राजनाथसिंह यांचे वक्तव्य म्हणजे अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार : मिटकरी  SaamTv
महाराष्ट्र

राजनाथसिंह यांचे वक्तव्य म्हणजे अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार : मिटकरी

जयेश गावंडे

अकोला - राजनाथसिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या व्यक्तव्याबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अभ्यासपूर्ण व्यक्तव्य न करता अकलेचे तारे तोडण्याचा प्रकार करणाऱ्या राजनाथसिंह यांना महाराष्ट्रात येताना विचार करावा लागेल. तसेच महाराष्ट्रातली शिवप्रेमी जनता भाजपची कबर खोदल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम शिवव्याख्याते तथा आमदार अमोल मिटकरी यांनी राजनाथसिंह यांना आपल्या प्रतिकियेतून दिला आहे.

हे देखील पहा -

मिटकरी म्हणाले, राजनाथसिंह हे जरी देशाचे संरक्षण मंत्री असले तरी फ्रान्सला राफेल खरेदी करताना भारताचे दिवाळे काढले हे अख्या जगाने पाहिले आहे. राजनाथसिंह यांनी काढलेले व्यक्तव्य हे अकलेचे ताडे तोडणारे आहे. मी राजनाथसिंह यांना सांगू इच्छितो की, भाजप अख्या महाराष्ट्रात बदनाम होतोच आहे.

उरली-सुरली इज्जत जर ठेवायची असेल तर शिवाजी महाराजांवर बोलताना थोडा अभ्यास करून बोलावे, अन्यथा महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता भाजपची कबर खोदेल आणि तुम्हाला सुध्दा महाराष्ट्रात येताना दहावेळा विचार करावा लागेल. परत शिवाजी महाराज, शहाजी राजे, जिजामाता जिजाऊ हे एकच कुटुंब आहे. वीरबाजी पासलकर यांनी त्यांना प्रशिक्षण दिले आहे. दादोजी कोंडदेव यांचा त्यांच्याशी संबंध नाही, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

Beed News: 3 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारने रेल्वेचा पावणेचारशे कोटींचा निधी अडवला, प्रीतम मुंडेंचा गंभीर आरोप

Agricultural Commodities Export : भारताची कृषीनिर्यात ९ टक्क्यांनी घसरली, कृषीतज्ज्ञ डॉ. परशराम पाटील यांनी व्यक्त केली उच्चप्रतिच्या निर्यातीची गरज

SCROLL FOR NEXT