Mira Bhayandar News Saam tv
महाराष्ट्र

Mira Bhayandar News : गांजा विक्री प्रकरणात दोन जणांना अटक; १ लाखाचा मुद्देमाल जप्त

Mira Bhayander News : गांजा विक्री करण्यास बंदी असताना बाहेरून येत गांजा विक्री करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती.

Rajesh Sonwane

महेंद्र वानखेडे

मिरा भाईंदर : काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Mira Bhayandar) त्यांच्याकडून चार किलो वजनाचा गांजा व इतर साहित्य असे जवळपास १ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Live Marathi News)

गांजा विक्री करण्यास बंदी असताना बाहेरून येत गांजा विक्री करण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जात होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार (Police) पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी सुरत (Surat) येथील असून बॅगेत गांजा विक्रीसाठी घेऊन ते मिरारोड येथे आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यांच्यावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याशिवाय त्यांच्यावर अजून गुन्हे दाखल आहेत का? याबाबत पोलीस तपास करण्यासाठी पथक पाठवण्यात आले आहेत. तसेच कोणालाही अश्या प्रकारचे चुकीचे काम होत असल्याचे दिसल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा व त्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल असे आव्हान पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eye Health : डिम लाईटमध्ये पुस्तक वाचण्याची सवय ठरू शकते धोकादायक, हे ८ तोटे वेळीच जाणून घ्या नाहीतर...

Karjat Fort : प्राचीन व्यापारी मार्गांचा पहारेकरी, १२०० फूट उंचीवर कर्जतजवळ वसलाय 'हा' ऐतिहासिक किल्ला

Maharashtra News Live Update: रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीच्या जमीन अर्जावर आज कोर्टात 3 तास सुनावणी

...तरच मी उपोषण सोडणार; सोनम वांगचुक यांनी सरकारकडे केल्या या २ प्रमुख मागण्या

विद्यार्थ्यांची माफी मागा, राहुल गांधींनी सरकारला ठणकावलं; शिक्षणव्यवस्थेवर ठेवलं बोट, आंदोलकांच्या प्रमुख मागण्यांकडं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT