मोठ्या शहरांमध्ये किमान वेतनात वाढ; सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ३०,५२० रुपये किमान वेतनाची घोषणा Google
महाराष्ट्र

Mumbai: मोठ्या शहरांमध्ये किमान वेतनात वाढ; सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ३०,५२० रुपये किमान वेतनाची घोषणा

Wage Policy: महाराष्ट्र सरकारने नवीन मसुद्यानुसार मोठ्या शहरांसाठी किमान वेतन ₹,३०,५२० निश्चित केले असून, ते कुशलतेनुसार व क्षेत्रानुसार वर्गीकृत केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील गावे वगळता इतर सर्व ठिकाणी कामगारांचे किमान वेतन वाढविण्यात येणार आहे. यासंदर्भात कामगार विभागाने अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेवर पुढील दोन महिन्यांत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र शासनाने कामगारांसाठी किमान वेतन निश्चित करताना त्यांना कुशल (Skilled), अर्थकुशल (Semi-skilled) आणि अकुशल (Unskilled) अशा तीन गटांमध्ये विभागले आहे. याशिवाय, वेतन ठरवताना राज्यातील शहरांची वर्गवारी परिमंडळ १, परिमंडळ २ आणि परिमंडळ ३ अशी केली आहे.

परिमंडळ एकमध्ये राज्यातील सर्व अ आणि ब वर्ग महापालिका, नगरपालिकांचा समावेश असेल. परिमंडळ २ मध्ये क आणि ड वर्ग महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांचा समावेश असेल. परिमंडळ ३ मध्ये परिमंडळ १ आणि परिमंडळ २ वगळून उर्वरित सर्व क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश आहे.

कसे होतील बदल?

राजांदरीवर (कंत्राटी किंवा बांधकाम क्षेत्रातील) काम करणाऱ्या कामगारांना दिल्या जाणाऱ्या किमान मजुरीचे दर त्यांच्या संबंधित श्रेणी (वर्ग) नुसार निश्चित केले जातात. प्रत्येक कामगाराच्या श्रेणीसाठी मासिक मजुरीचा दर ठरवलेला असतो. त्या मासिक दराला २६ ने भागून (कारण महिन्यात साधारणपणे २६ कामाचे दिवस धरले जातात) दैनिक मजुरी काढली जाते. हा भागाकार नजीकच्या पैशांपर्यंत पूर्णांकित करून अंतिम दर ठरवला जातो.

उदाहरण:

जर एखाद्या श्रेणीसाठी मासिक किमान वेतन ₹१३,००० असेल, तर दैनिक मजुरी = ₹१३,००० ÷ २६ = ₹५०० प्रति दिवस

अर्धवेळ काम करणाऱ्या कामगारांना प्रतितास किमान वेतन ठरवण्यासाठी पुढील पद्धत वापरण्यात येते. संबंधित वर्गवारीचे रोजंदारी किमान वेतन (8 तासांच्या पूर्ण दिवसासाठी असलेले वेतन) घेतले जाते. त्या रकमेचा 8 तासांनी भाग दिला जातो, म्हणजेच 1 तासासाठी वेतन निश्चित होते. त्यावर 15% वाढ केली जाते. मिळालेली अंतिम रक्कम नजीकच्या पूर्णांक रुपयांमध्ये परिवर्तित केली जाते.

राज्यातील किमान वेतन दरामध्ये साप्ताहिक सुट्टीच्या वेतनाचाही समावेश असेल. साधारणतः दर पाच वर्षांनी राज्य सरकार कामगारांसाठी किमान वेतन दर निश्चित करते. मात्र, २०१५ पासून हे दर अद्ययावत झाले नव्हते. आता तब्बल दहा वर्षांनंतर हे दर बदलले जाणार आहेत, त्यामुळे कामगारांना नव्या वेतन संरचनेचा लाभ मिळणार आहे.

Edited By - Purva Palande

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मध्य प्रदेशमध्ये इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू

Artist Death : मनोरंजन विश्वावर शोककळा, सोशल मीडिया स्टारनं घेतला अखेरचा श्वास

मध्य रेल्वेवर प्रवाशांचा खोळंबा; कुर्ल्यापुढे लोकल सेवा बंद|VIDEO

Morning Weight Loss Drink: जिऱ्याचं पाणी की सब्जाचं पाणी? वजन झटपट कमी करण्यासाठी कोणते ड्रिंक सर्वात बेस्ट?

Historical Places : प्रेमाचे अद्वितीय प्रतीक! जोडीदारासोबत आयुष्यात एकदा तरी 'हे' ठिकाण फिराच

SCROLL FOR NEXT