HIjab : 'जातीय सलोखा राखण्यास कर्नाटक सरकार अपयशी; कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करा' Saam TV
महाराष्ट्र

HIjab : 'जातीय सलोखा राखण्यास कर्नाटक सरकार अपयशी; कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करा'

कर्नाटकात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची दोन वेळा विटंबना झाली आहे. टिपू सुलतान यांच्या विषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली आहे.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : कर्नाटक राज्यातील उडपीमध्ये मुस्लिम समाजातील कॉलेजच्या विद्यार्थिनींना हिजाब (Hijab) घालण्यावरून मोठा वाद उफाळला आहे. आता या वादात हिंदुत्ववादी संघटना उतरल्याने त्याला वेगळे वळण लागले आहे.

हिजाब घालण्यास विरोध करणाऱ्या स्थानिक भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या (BJP and Vishwa Hindu Parishad) गावगुंड कार्यकर्त्यांवर तात्काळ कारवाई करावी, कर्नाटकात यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांची दोनवेळा विटंबना झाली आहे. टिपू सुलतान यांच्या विषयी वादग्रस्त विधाने करण्यात आली त्यामुळे कर्नाटक सरकार (Karnataka Goverment) हे राज्यात जातीय सलोखा राखण्यास अपयशी ठरल्याने सरकार बरखास्त करून त्याठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी एमआयएम पक्षाच्यावतीने राष्ट्रपतींना करण्यात आली.

याबाबतचे निवेदन सांगली जिल्हा अध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना देण्यात आले. यावेळी MIM पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT