आमदार रोहित पवारांची पत्रकार परिषद सुरु झाली आहे. यामध्ये त्यांनी अजितदादांच्या अपघाताबाबत शंका व्यक्त केली आहे.
पुण्यातील बुधवार पेठेतून ११ बांगलादेशी महिला ताब्यात
बोगस आधार कार्ड आणि कागदपत्रांच्या आधारे करत होत्या बुधवार पेठेत वास्तव्य
पुणे पोलिसांची बुधवार पेठेत मोठी कारवाई
अनधिकृतपणे वास्तव करून कुंटणखान्यात करत होत्या काम
फरासखाना पोलिसांची बुधवार पेठेत छापेमारी
एकूण २२ महिलांना ताब्यात घेऊन त्यातील ११ या बांगलादेशी असल्याचे तपासातून समोर
कामठी येथे बाजार परिसरातील मुख्य मार्गावर नगरपरिषद प्रशासनाकडून विशेष अतिक्रमण हटाव मोहीम.
शहरात अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून नागरिकांकडून नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी केल्या जात आहेत.
शहीद स्मारक चौक ते गांधी मंच तसेच शिवाजी चौक ते न्यू कामठी पोलिस स्टेशन या मार्गावर पथकाने गस्त घालत कारवाई केली.
रस्त्यावर उभारलेली तात्पुरती शेड, हातगाड्या आणि इतर साहित्य हटविण्यात आले.
संबंधितांना रस्त्यावर दुकाने न लावण्याची सक्त ताकीद देण्यात आली.
नागरिकांनी सातत्यपूर्ण आणि कडक अंमलबजावणीची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्यावरून आता अल्पसंख्याक आयोग ऍक्शन मोड मध्ये
अल्पसंख्याक आयोगाने विभागाला नोटीस बजावत 7 दिवसात उत्तर सादर करण्याचे दिले निर्देश
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी बजावली नोटीस
अल्पसंख्याक विभागाने उत्तर सादर केल्यावर त्यावर पुढील कारवाई केली जाणार
काल उपसचिवांची बदली केल्यानंतर आता अल्पसंख्याक आयोगाचे दिले चौकशी आदेश
कोकणातल्या पहिल्या टप्प्यातील आंब्याला केवळ दहा टक्केच फळ धारणा
नोव्हेंबर महिन्यात आलेल्या आंब्याच्या मोहराला फळधारणा नाहीच
थंडीमध्ये 80 ते 90 टक्के आंब्याच्या झाडांना आला होता मोहर
सततचं धुके, ढगाळ हवामान, तर कधी जास्त थंडी यामुळे मोहर पडला काळा
दुसऱ्या टप्प्यातील आंब्याच्या झाडांना सध्या मोहराची प्रक्रिया सुरू
पहिल्या टप्प्यात दहा टक्के पेक्षा सुद्धा कमी फळधारणा झाल्याने आंबा बागायतदार संकटात
मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील कोकणातल्या घटलेल्या आंब्याच्या उत्पादनावर चर्चा
भिगवण प्रकरणात गोपीचंद पडळकर यांची आज होणाऱ्या सभेला पुणे ग्रामीण पोलिसांनी नाकारली परवानगी
तणाव निर्माण होऊ नये तसेच उद्या शिवजयंती असल्यामुळे पोलिसांनी सभेसाठी परवानगी नाकारली
गेले पाच दिवस करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सुरू असलेली दानपेट्यांची मोजणी काल पूर्ण झाली. गेल्या दोन महिन्यांत आलेल्या भाविकांनी तब्बल दोन कोटी एकवीस लाख पस्तीस हजार ५२६ रुपयांचे दान देवीच्या चरणी अर्पण केले.
अल्फाबेट, मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, अॅडोब, पावलो अल्टो नेटवर्कस् यांसारख्या जागतिक कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे सीईओ आहेत आणि आता चॅनेलच्या सीईओसुद्धा कोल्हापूर (महाराष्ट्र) मधील आहेत. भारत केवळ जागतिक नवोन्मेषात सहभागी होत नाही, तर अशा ठिकाणी नेतृत्व करतो, असे गौरवोद्गार फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काढत कोल्हापूरच्या कन्येचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी लीना नायर यांचा उल्लेख केला ते जागतिक नेतृत्वाचे उदाहरण म्हणून. त्या उल्लेखाने कोल्हापूरच्या कन्येने जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा कसा उमटवला आहे, याचा दाखला काल मुंबईत झालेल्या इंडिया-फ्रान्स इनोव्हेशन फोरममध्ये मॅक्रॉन यांनी दिला. कोल्हापूरच्या मातीत घडलेल्या कन्येच्या प्रेरणादायी वाटचालीवर प्रकाश पडला.
महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कृष्णा नदीवरील शेवटचा बंधारा असलेल्या राजापूर बंधाऱ्यावर तातडीने पोलिस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी स्वाभिमानी युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हा उपाध्यक्ष बंडू पाटील यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.
धाराशिवच्या उमरगा तालुक्यात पंचायत समितीच्या सभापतीपदावरून सुरू असलेला भाजप-शिवसेना वाद अद्याप मिटलेला नाही.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष कैलास शिंदे आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची कन्या आकांक्षा चौगुले यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरूच आहे.भुसनी गणातून भाजपकडून विजयी झालेले कैलास शिंदे तर केसर जवळगा गणातून शिवसेनेकडून निवडून आलेल्या आकांक्षा चौगुले हे दोघे ही सभापती पदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. महायुतीमध्ये दोघांनाही अडीच-अडीच वर्षांची संधी देण्याचा फॉर्म्युला चर्चेत आला असला तरी पहिली संधी कोणाला मिळणार यावरून पेच निर्माण झाला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार स्थानिक पातळीवर बैठका सुरू असून पक्षश्रेष्ठीकडेही याबाबतचा वाद पोहचल्याची माहिती आहे.उमरगा पंचायत समितीमध्ये निवडून आलेले भाजपचे सात सदस्य मुंबईच्या सहलीवर आहेत.
- गंभीर आजारांचा मागोवा शक्य
- एम्स नागपूर आणि आयआयटी बॉम्बे यांचा संयुक्त पुढाकार घेतला आहेय...
- आवाजातील स्वर, कंपन, लय, गतीतील बदलांचे विश्लेषण, नैराश्य, श्वसनविकार, पार्किन्सनसारख्या न्यूरोलॉजिकल आजारांचे संकेत शोधणार
- ध्वनिनियंत्रित खोलीत रुग्णांकडून ठरावीक मजकूर वाचन, प्रगत अल्गोरिदमद्वारे सूक्ष्म नमुन्यांचे विश्लेषण होणार
- पारंपरिक तपासण्यांपेक्षा जलद, कमी खर्चिक पद्धत, ग्रामीण आणि संसाधनअभावी भागांसाठी उपयुक्त तंत्रज्ञान ठरणार
- मोबाईल, टेलिमेडिसिन प्लॅटफॉर्मशी जोडण्याची शक्यता....
धाड परिसरात गुंडगिरी करून सामान्य नागरिकांच्या मनात आपली दहशत निर्माण करणारे काही टवाळखोरांनी एका मेडिकल संचालकास मारहाण करत हप्ता मागितला होता.. पोलिसांकडे तक्रार प्राप्त होताच हप्तेखोर गॅंगमधील 3 आरोपींची धाड पोलिसांनी गावातून धिंड काढून जनतेच्या मनात निर्माण झालेली धास्ती मोडून काढण्याचा प्रयत्न केला आहे.. दुधा येथील पवन राजेंद्र सोनुने यांनी धाड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून त्यांना धाड येथील चार जणांना अडवून व्यवसाय करायचा असल्यास आम्हाला हप्ता द्यावा लागेल असे म्हणत मारहाण केली होती.. तर याच आरोपींनी इतर हॉटेल चालकांना देखील हप्त्याची मागणी केली होती, मात्र तक्रार दाखल नाही.. या गँगची हिंमत वाढत असल्याने ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी कठोर पावले उचलत अक्षय बिलांगे, रोशन शिंदे, राहुल दळवी या तिघांना अटक करून त्यांची गावातून धिंड काढली, यामुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे...
- विद्यमान सरपंचांनाच प्रशासक नेमण्याचा शासनाचा विचार, सदस्यांनाही प्रशासकीय समितीत सहभागी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं राज्य सरकारचे म्हणणे...
- संबंधित ग्रामपंचायतीचा कारभार सुरळित चालण्यासाठी सरपंचाच्या मदतीने प्रशासकीय समितीही स्थापन केली जाणार ...
- ग्रामपंचायतीवरील प्रशासक आणि प्रशासकीय समितीचा कार्यकाळ सहा महिन्यांचा असणार
- मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठात सुनावणी, २३ जानेवारी २०२६ च्या शासन परिपत्रकावर अंतरिम स्थगिती
- निवडणुका न घेता प्रशासक नेमण्याच्या निर्णयाला आव्हान, न्या. अनिल किलोर आणि न्या. राज वाकोडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी
यवतमाळ जिल्ह्यातील 980 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपण्यावर आला आहे त्यामुळे जिल्हा परिषद कडून प्रशासक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यातच आता ग्रामविकास विभागाने जानेवारी ते डिसेंबर 2026 पर्यंत मुदत संपणाऱ्या आणि नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे चार मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार असून निवडणूका दिवाळीत होईल अशी शक्यता आहे.
महाडचे ग्राम दैवत श्री वीरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाची आज मध्यरात्री सांगता होणार आहे. महाशिवरात्री पासून या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. मंदिरात धार्मिक विधी, देवी देवतांच्या पालखींच आगमन सुरू आहे. आज संध्याकाळी महाड तालुक्यातील विवीध देवी देवतांच्या पालख्या वीरेश्वर मंदिरात येतील. यासोबत लाखोंचा भक्त समुदाय देखील महाड शहरात दाखल होणार आहे. या निमित्ताने मिठाई, प्रसादची दुकान, खेळणी, शोभिवंत वस्तुंची दुकान आणि उंचउंच आकाश पाळणे देखील महाडमध्ये दाखल झाले आहेत. यामुळे महाड शहराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा जत्रोत्सव म्हणून महाडच्या छबिना उत्सवाची ओळख आहे.
तळोदा शहरातील काकशेठ गल्ली जवळ रात्री भीषण प्रसंग घडला. विद्युत ट्रान्सफॉर्मला अचानक आग लागली. परिसरात काही क्षणांकरिता भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि विजेचा पुरवठा तातडीने बंद केल्याने मोठा अनर्थ टळला. रात्री दरम्यान अचानक खांबावरून ठिणग्या उडू लागल्या आणि काही क्षणांतच डिपीतून धूर व ज्वाळा निघू लागल्या नागरिकांनी तत्काळ माती आणि वाळू टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.
पुणे महानगरपालिकेच्या इतिहासात एक अनोखी घटना घडली आहे. राज्य शासनाच्या नवीन अध्यादेशाचा आधार घेऊन पहिल्यांदाच बिगर राजकीय (पक्षविरहित) व्यक्तीने स्वीकृत नगरसेवक पदासाठी स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. या अर्जाचा आधार घेत ॲड. प्रियांका पिसे यांनी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे हा अर्ज सुपूर्द केला आहे.
खवले मांजराचे खवले आणि सांबर प्राण्याच्या शिंगांसह दोघे जेरबंद
मंचर वनपरिक्षेत्राच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे मोरडे फूड्स कंपनीजवळ सापळा रचून दोघांना अटक केली
आरोपींकडून सुमारे ३ किलो खवले मांजराचे खवले, तीन नखे, चार सांबर शिंगे आणि स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली आहे
दोघांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शहरात उद्या मध्यवर्ती भागातून मिरवणुका काढण्यात येणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता
त्यामुळे लक्ष्मी रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता तसेच परिसरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूक वाढून कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत
गुरुवारी सकाळी सात पासून सायंकाळी गर्दी संपेपर्यंत मध्यवर्ती भागात वाहतूक आवश्यकतेनुसार वळविण्यात येणार आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.