मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज जालन्यातील अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने कूच निघणार आहे. त्यापूर्वी पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी सरकारला शेवटचा इशारा दिला आहे. चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत, लवकरच आरक्षणावर निर्णय घ्या, असं भावनिक आवाहन मनोज जरांगे यांनी सरकारला केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आमचे पोरं जर मोठे करायचे असतील, तर आज मुंबईला जाण्यापासून पर्याय नाही, असं देखील जरांगे यांनी ठणकावून सांगितलं आहे. मी असेन माहित नाही पण मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळालं हवं, असंही जरांगे यांनी म्हटलं आहे. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.
२६ तारखेला राज्यातील सर्व मराठा बांधवांनी मुंबईला यावं, माझं शरीर मला साथ देत नाही. मी असेन किंवा नसेल, पण समाजाची एकजूट फुटू देऊ नका, छातीवर गोळ्या पडल्या तरी आता माघार नाही, असंही जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मुंबईत निघण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. आता २६ जानेवारीपासून नाही तर अंतरवाली सराटीपासून मी आमरण उपोषण निर्णय घेणार आहे. हा निर्णय मी माझ्या समाजाला विचारुन निर्णय घेणार आहे. आता समाजाला जीव अर्पण करायचा आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
मराठा समाजाने आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला ७ महिन्यांचा वेळ दिला. मात्र, अजूनही आरक्षण मिळाले नाही. आता आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाही. मी असेल नसेल विचार जागे ठेवा, असे सांगताना मनोज जरांगे पाटील भावूक झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.