manai adesh in ratnagiri from today till 8 february saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून मनाई आदेश लागू

अमोल कलये

Ratnagiri News :

प्रजासत्ताक दिनाच्या (republic day 2024) पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आजपासून (ता. 25) आठ फेब्रवारीपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश अप्पर जिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी नुकताच जारी केला आहे. (Maharashtra News)

समाज माध्यमातून (social media) आक्षेपार्ह पाेस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे राज्यासह जिल्ह्या-जिल्ह्यात तणावचं वातावरण निर्माण हाेत आहे. या घटनांचा पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात देखील उमटू शकतील अशी शक्यता पाेलिस प्रशासनास वाटू लागल्याने त्यांनी जिल्हा प्रशासनाशी पत्रव्यवहार केला.

या पत्रव्यवहार नूसार जिल्हा प्रशासनाने रत्नागिरी जिल्ह्यात कुठलीही अनुचित घटना घडू नये, शांतता, सुव्यवस्था कायम रहावी, या उद्देशाने रत्नागिरी 25 जानेवारी ते आठ फेब्रुवारी या कालावधीत मनाई आदेश लागु केला आहे. या कालावधीत व्यक्ती, संस्था, संघटना यांनी आंदाेलन सारखे प्रकार टाळावेत, करु नयेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; तीन वाहने एकमेकांना धडकली, पाहा VIDEO

Sukanya Samruddhi Yojana: १० हजार १५ वर्षे भरा, २१ व्या वर्षी मुलीच्या खात्यात तब्बल ३८ लाख; जाणून घ्या सरकारची भन्नाट योजना

Maharashtra Politics : महायुतीच्या जागावाटपाचं घोडं कुठं अडलं? कोणत्या पक्षाला काय हवं?

Mumbai Metro News: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! 'मेट्रो ३' आरे ते बीकेसी टप्पा लवकरच सुरु होणार; ऑक्टोंबरमध्ये PM मोदी करणार लोकार्पण

Maharashtra Politics : अमित शहा पुन्हा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार; महायुतीत काहीतरी मोठं घडणार, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT