Flood In Beed  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Rain Update: राज्यात मुसळधार...बीडमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, नदी-ओढ्यांना पूर

Priya More

राज्यामध्ये मान्सून (Monsoon 2024) दाखल झाल्यापासून सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. बीडमध्ये ढगफुटी झाल्यासारखा पाऊस झालाय. त्यामुळे नदी, नाले आणि ओढ्यांना पूर आला आहे. तर राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. राज्यात पावसाची काय परिस्थिती आहे ते आपण पाहणार आहोत...

बीड -

बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. बीड तालुक्यातील आंबेसावळी, घाटसावळी, बेलवाडी, पिंपळनेर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर आला असून नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर दुसरीकडे बीडच्या पिंपळनेर परिसरातून वाहणाऱ्या मनकर्णिका नदीला पूर आलाय. यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक खोळंबली आहे. दरम्यान दुष्काळी बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांसह बीडकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हिंगोली -

हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. हिंगोली जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. वामन लोणकर (वय 60 वर्षे) असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. हिंगोलीच्या सिगनगी खांबा गावातील ही घटना आहे. शेतात हळद लागवड करत असताना अचानक वीज कोसळल्याने या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

जालना -

जालन्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. जालन्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर आज पावसाला जोरदार सुरूवात झालीय. जालना शहरासह अनेक गावात सायंकाळी जोरदार पाऊस झाला. पेरणी झालेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत उकाड्यामुळे हैराण झालेल्या जालनाकरांना दिलासा मिळाला.

यवतमाळ -

दिवसभराच्या कडक उन्हानंतर सायंकाळच्या सुमारास यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटसह जोरदार पावसाने हजेरी लावली. यवतमाळ शहरासह आसपासच्या परिसरामध्ये अर्धा तासापेक्षा जास्त वेळ मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांची उकड्यापासून सुटका झाली.

अमरावती -

अमरावती जिल्ह्यात अखेर आज मान्सून दाखल झाला. आजपासून पुढचे 3 दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. मान्सून दाखल झाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. सलग पाऊस सुरू राहिल्यास जिल्ह्यात पेरणीला सुरुवात होणार आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी सुखावला आहे.

वाशिम -

वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. वाशिम शहरासह मालेगाव, रिसोड, मंगरूळपीर तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. दोन दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसाने आज पुन्हा दमदार सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची लगबग वाढणार आहे.

छत्रपती संभाजीनगर -

छत्रपती संभाजीनगरमध्ये वीज पडून एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. वैजापूर तालुक्यातील शिवाराईमध्ये ही घटना घडली. शेतामध्ये काम करत असताना अचानक मुसळधार पाऊस आला. या पावसापासून आपला बचाव करण्यासाठी चारही शेतकरी प्लास्टिकची ताडपत्री डोक्यावर घेऊन बसले. तेवढ्यात वीज कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाले. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मराठवाड्यात १४ दिवसांत वीज पडून २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Killing Case : स्वप्न पडलं, डेड बॉडीचं गूढ उलगडलं? रत्नागिरीतील हत्याकांडाचा सस्पेन्स उलगडणार? पाहा व्हिडिओ

Tirupati Laddoos: 'तिरुपती बालाजीच्या लाडूंमध्ये चरबीचा वापर'; सीएम चंद्राबाबू नायडूंचा रेड्डी यांच्या सरकारवर गंभीर आरोप

STREE 2 च्या कोरिओग्राफरला केली अटक, अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप

Ajit Pawar: वाचाळवीरांनी मर्यादा पाळाव्यात; अजित पवारांनी CM शिंदेंसमोरच आमदारांचे टोचले कान

Friday Horoscope: शुक्रवारी या 5 राशींचे नशीब फळफळणार, देवी लक्ष्मीची होणार कृपा; वाचा राशिभविष्य

SCROLL FOR NEXT