Maharashtra Vidhan Parishad Election BJP Shiv sena NCP All Candidate List name : राज्यात होत असलेल्या विधान परिषदेच्या १० जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. भाजपकडून ६, राष्ट्रवादी काँग्रेस १, शिंदेसेना २ आणि ठाकरेंची शिवसेना १, असे १० उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. १२ मे रोजी १० जागांसाठी मतदान पार पडणार आहे, तर त्याचदिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे. ठाकरेंनी अंबादास दानवेंना तिकीट दिल्यामुळे मविआत फूट पडली आहे. काँग्रेसही उमेदवार उतरवण्याची शक्यता आहे. जर काँग्रेसने उमेदवार उतरवला तर भाजप अथवा शिंदेंची शिवसेना अतिरिक्त उमेदवार उतरवू शकते. एकनाथ शिंदेंकडून तसे संकेत देण्यात आले आहेत.
विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडून अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कोणत्या नेत्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळाली, त्यावर एक नजर मारूयात...
भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार कोणते?
प्रज्ञा सातव
प्रमोद जठार
संजय भेंडे
माधवी नाईक
विवेक कोल्हे
सुनिल कर्जतकर
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार
बच्चू कडू
निलम गोऱ्हे
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
झिशान सिद्दीकी
शिवसेना ठाकरे गट
अंबादास दानवे
काँग्रेस उमेदवार देणार? कुणाच्या नावाची चर्चा ?
काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधान परिषदेत आपला उमेदवार निवडून येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला आहे. कुणाला उमेदवारी द्यायची, त्यासाठी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची आज बैठक झाली. त्यामध्ये बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सचिन सावंत, अतुल लोंढे, यशोमती ठाकूर , मोहन जोशी, नसीम खान या सात नावांची जोरदार चर्चा झाली. दुसरीकडे काँग्रेसची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न करण्यात आले. पण ही चर्चा व्यर्थ केली. काँग्रेस उमेदवारी देण्यावर ठाम असल्याचे समजतेय.
निवडणुकीची अधिसूचना जारी – २३ एप्रिल, २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस – ३० एप्रिल, २०२६ (गुरुवार)
उमेदवारी अर्जांची छाननी – २ मे, २०२६ (शनिवार)
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस – ४ मे, २०२६ (सोमवार)
मतदानाचा दिनांक – १२ मे, २०२६ (मंगळवार)
मतदानाची वेळ – सकाळी ०९:०० ते दुपारी ०४:०० पर्यंत
मतमोजणी (निकाल) – १२ मे, २०२६ (मंगळवार) सायंकाळी ०५:०० वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा अंतिम दिनांक – १३ मे, २०२६ (बुधवार)
विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजपकडे १३१ आमदार आहेत तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ५७ आमदार आहेत. अजित पवार गट राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. त्यामुळे महायुतीचे ९ उमेदवार निवडून येणार हे निश्चित आहे. तर विरोधकांना फक्त एकच जागा मिळू शकते. ठाकरेसेना २०, काँग्रेस १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस १०.. अशा विरोधकांकडे ४६ आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे आता काँग्रेस काय निर्णय घेणार, त्यावर विधान परिषद निवडणुका बिनविरोध होणार की नाही, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.