Vande Bharat Train Saam Tv
महाराष्ट्र

Vande Bharat Train : राज्याला मिळाल्या ३ वंदे भारत एक्स्प्रेस; कोणत्या मार्गांवर धावतात, तिकिट किती? वेळापत्रक काय?

Maharashtra Three New Vande Bharat Trains : महाराष्ट्राला आता तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळालेल्या आहेत. त्या नेमक्या कोणत्या मार्गावर धावणार, स्थानके कोणते असतील याबाबत सविस्तर आपण जाणून घेवू या.

Rohini Gudaghe

मुंबई : भारतीय रेल्वे वंदे भारत गाड्यांची संख्या सातत्याने वाढवत आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांचे उद्घाटन केलंय. त्यामुळे आता महाराष्ट्रातील वंदे भारत एक्स्प्रेसची संख्या ११ झालीय. या नवीन एक्स्प्रेस नागपूर-सिकंदराबाद, कोल्हापूर-पुणे आणि पुणे-हुबळी या मार्गावर धावत आहेत.

यापूर्वी राज्यात आठ वंदे भारत एक्स्प्रेस धावत (Vande Bharat Train) होत्या. मुंबई-अहमदाबाद, मुंबई-गांधीनगर, मुंबई-मडगाव, मुंबई-सोलापूर, मुंबई-साईनगर शिर्डी, मुंबई-जालना, नागपूर-रायपूर आणि नागपूर-बिलासपूर या मार्गांसह पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेद्वारे या गाड्या चालवल्या जात होत्या. यामध्ये आता तीन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडली आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे.

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस

कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस (Kolhapur To Pune) ही आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच बुधवार, शुक्रवार आणि रविवार धावते. ही एक्सप्रेस पुण्याहून दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी निघते आणि कोल्हापुरमध्ये सायंकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. परतीच्या प्रवासात कोल्हापूरहून सकाळी सव्वा आठ वाजता निघते, पुण्यात दुपारी दीड वाजेच्या सुमारास पोहोचते. कोल्हापूर-पुणे वंदे भारत मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा घेते.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस

पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेस (Pune To Hubli) ही आठवड्यातून तीन दिवस म्हणजेच गुरुवार, शनिवार आणि सोमवार धावते. ही एक्सप्रेस पुण्याहून दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी सुटते आणि हुबळी स्थानकावर रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी पोहोचते. परतीच्या प्रवासात गाडी हुबळी येथून पहाटे ५ वाजता निघते. पुण्यात दुपारी दीड वाजेचया सुमारास पोहोचते. ही ट्रेन सातारा, सांगली, मिरज, बेळगावी, धारवाड या स्थानकांवर थांबा घेते.

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस

नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस (Nagpur To Secunderabad)आठवड्यातून सहा दिवस धावते. फक्त मंगळवारी बंद असते. नागपूरहून पहाटे ५ वाजता सुटते, अन् सिकंदराबादमध्ये दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी पोहोचते. परतीच्या प्रवासात नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद येथून दुपारी १ वाजता निघते. रात्री ८ वाजून २० मिनिटांनी नागपूरला पोहोचते. सेवाग्राम, चंद्रपूर, बल्लारशाह, रामगुंडम, काझीपेठ या स्थानकांवर गाडी थांबा घेते.

सरकार प्रत्येक राज्यात बंदे भारत ट्रेनची संख्या वाढवण्याचे काम करत आहे. जेणेकरून रेल्वे कनेक्टिव्हिटीला नवी गती मिळू शकेल. वंदे भारत ट्रेनने खूप कमी वेळात लांबचे अंतर कापले जाते. सामान्य गाड्यांच्या तुलनेत या ट्रेनमध्ये चांगल्या सुविधा देण्यात आल्या आहेत. सरकार लवकरच बंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन देखील लॉन्च करणार असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पतीचं निधन, दुसऱ्या लग्नासाठी आईनं १० हजारांना मूल विकलं? नातवंडासाठी जीव तीळ तीळ तुटणाऱ्या आजीचा आरोप

Sansad Ratna Award 2025 : महाराष्ट्रातील ७ खासदारांनी दिल्लीत नाव गाजवलं; सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह निशिकांत दुबेंनाही संसदरत्न पुरस्कार

Best Indian Patriotic Movies: या विकेंडला बघा देशभक्ती जागवणारे हे ७ चित्रपट

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील काँग्रेस कमिटीमध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा

Jasprit Bumrah Retirement : टीम इंडियाला मोठा हादरा! जसप्रीत बुमराह कसोटीतून निवृत्ती घेणार?

SCROLL FOR NEXT