uddhav Thackeray
uddhav Thackeray  saam tv
महाराष्ट्र

Gram Panchayat Election 2022: उद्धव ठाकरे गटाचा भाजपला पहिला धक्का; साेलापुरात ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या गटाने पहिले खाते उघडले आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे. माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे.

राज्यातली सत्ता हातून गेल्यानंतर शिवसेना आता पुन्हा एकदा नव्याने उभारी घेतली आहे. सोलापूरमध्ये उध्दव ठाकरे यांच्या गटाचं पहिलं खातं उघडलं आहे. भाजप आमदार आणि माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला झटका बसला आहे. सोलापुरात सुभाष देशमुख यांचं मोठं वर्चस्व आहे त्यामुळे त्यांचा हा पराभव मोठा धक्का देणारा आहे.

आता माजी आमदार रविकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे सत्ता गेली आहे. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतर राज्यातील निवडणुकीकडे सर्वाचं लक्ष होतं. अन् अश्यात सोलापुरात शिवसेनेचा दणदणीत विजय झाला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह आहे.

राज्याच्या आज 15 जिल्ह्यातील 238 ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकलाकाकडे सर्वाचं लक्ष लागलेले आहे. नाशिक जिल्ह्यातील 36, परभणी 2, उस्मानाबाद 9, जालना 27, लातूर 6,अहमदनगर 13, पुणे 17, सोलापूर 25, धुळे 41, जळगाव 20, सातारा 7, सांगली 1, औरंगाबाद 16, बीड 13 आणि बुलडाणा जिल्ह्यातील 5 अशा एकूण 238 ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Milk Side Effect : दूधासोबत 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका; अन्यथा आयुष्यभर पश्चाताप होईल

Sleeping pills: तुम्ही देखिल झोपेच्या गोळ्या खाताय? होऊ शकतो शरीरावर दुष्परिणाम

Today's Marathi News Live : गोंदियामध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

Sharad Pawar on Narendra Modi: मोदींनी तरी कुठे कुटुंब सांभाळलं; 'त्या' टीकेला शरद पवारांचं सडेतोड उत्तर

Water Crisis Hits Maharashtra: पाणीसाठ्यात घट, नंदुरबारमध्ये 195 गावांना टंचाईच्या झळा; मालेगाव, हरसुलमध्ये भीषण स्थिती

SCROLL FOR NEXT