Sanjay Raut Eknath Shinde News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: 'PM मोदी, शहांच्या इशाऱ्यानंतर निवडणुका लागतील', CM शिंदेंच्या दाव्यावरुन संजय राऊतांचा टोला

Gangappa Pujari

रुपाली बडवे, मुंबई|ता. १६ सप्टेंबर

Sanjay Raut News: राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाचे विधान केले आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूका होतील, तसेच राज्यात दोन टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या दाव्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. निवडणुका कधी होतील हे मुख्यमंत्री निश्चित करणार नाहीत ते निवडणूक आयोग ठरवेल. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्री शहा यांनी इशारा दिल्यावर निवडणूका होतील. तिथे चीफ जस्टीस तारखा देत आहेत आणि इथे निवडणूक आयोग तारखा देत आहेत. काय चाललंय ? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

काय म्हणाले संजय राऊत?

"विधानसभेच्या निवडणुका कधी होतील हे मुख्यमंत्री निश्चित करणार नाही. त्यांनी निवडणूक आयोगाचा पदभार स्विकारला आहे का? न्यायालयाचा निकालही आधीच सांगतात. निवडणूकाच्या तारखा आयोग ठरवेल. त्यांना पंतप्रधान आणि गृहमंत्री शहा यांनी इशारा दिल्यावर निवडणुका होतील. देशात निवडणूक आयोग स्वतंत्र आणि निष्पक्ष नाही. भाजप नेत्यांच्या सोईनुसार निवडणुकांच्या तारखा, शेड्युल तयार होईल, असे संजय राऊत म्हणाले.

निवडणुका झाल्यास घरी जाल..

तसेच "जवळपास १४ महानगरपालिकेच्या निवडणुका पराभवाच्या भितीने होत नाहीत. हिंमत असेल तर इथे निवडणुका घ्या. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. तुम्ही इथे निवडणुका घेत नाही. ती वर्षांपासून इथे नगरसेवक नाहीत. पुणे, नाशिक, संभाजीनगरला निवडणूका नाहीत. तिथे चीफ जस्टीस तारखा देत आहेत आणि इथे निवडणूक आयोग तारखा देत आहेत. काय चाललंय काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. तसेच ज्या तारखेला निवडणूका होतील, त्या दिवशी घरी जाईल, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

PM मोदींवर निशाणा...

महायुतीमध्ये स्ट्राईक रेटवरुन जागा वाटप केले जाईल, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. यावरुनही संजय राऊत यांनी सडकून टीका केली. त्यांचा कसला स्ट्राईक रेट आहे. गद्दारी, लुटमारी, खोटे बोलण्यात, भ्रष्टाचार यात त्यांचा स्ट्राईक रेट जास्त आहे. कामाच्या बाबतीत तुमचा काय स्ट्राईक रेट आहे. राज्यात लाडकी बहीण योजनेचा ढोल वाजवला जात आहे. मात्र पंतप्रधान मोदींनी झारखंडमधील लाडकी बहीण योजनेवर टीका केली. अशा योजना, बोगस भंपक असून ही लाडक्या बहीणींची फसवणूक आहे असं मोदी म्हणाले. याच न्यायाने महाराष्ट्रातील योजनाही भंपक आहे, असं संजय राऊत म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT