भारतीय हवामान खात्यानं आगामी पावसासंदर्भात नवा अंदाज जाहीर केलाय. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील सर्वच विभागात कमी पावसाचा अंदाज असून यंदा उष्णतेची लाट जास्त राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय.
आधीच एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनचं आगमन लांबणीवर पडलंय. अशातच आता भारतीय हवामान विभागानं मान्सून हंगामातील पावसाचा सुधारित अंदाज वर्तवलाय...यंदाचा मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पावसाची अधिक शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलंय. जून ते सप्टेंबर या मान्सून हंगामात देशात सरासरीच्या 90 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जून महिन्यात देशाच्या बहुतांश भागांमध्ये पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची चिन्हे आहेत. तसेच, भारताच्या वायव्य, ईशान्य आणि दक्षिण द्विपकल्पातील काही भागांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागानं पावसाचा अंदाज 92 टक्क्यांवरून कमी करून 90 टक्क्यांपर्यंत केलाय. विशेष म्हणजे, कमी पर्जन्यमानाचं मुख्य कारण 'एल निनो' असल्याचं सांगितलय..त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच विभागात कमी पावसाचा अंदाज आहे. आधीच अवकाळी आणि महागाईनं कंबरडं मोडलेला शेतकरी आता या नव्या संकटामुळे हवालदिल झालाय. यंदा पावसाचं प्रमाण कमी राहिल्यास राज्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेसाठी चिंतेची बाब ठरणार आहे. इतकंच नव्हे तर खरीप हंगामातील पेरण्या खोळंबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानंतर राज्यातील बळीराजावर अस्मानी संकटाची टांगती तलवार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.