कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटातील करंजाळे येथे २५ जुलै रोजी रस्ता खचल्याने गेल्या नऊ दिवसांपासून घाट मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार असून सर्व वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
दोडामार्ग तालुक्यातील सोनावल येथील युवकाचा चंदगड (कोल्हापूर) येथे भीषण अपघात झाला. या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुभम डेगवेकर असे मृत युवकाचे नाव आहे. शुभम डेगवेकर हा दुचाकीवरून जात असताना त्यांची दुचाकी पोल्ट्री वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनावर आदळली. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच चंदगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला या पाचही जिल्ह्यांत मागील 2दिवसांत तब्बल ४५ तालुक्यांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यामध्ये नदी-नाल्यांना आलेल्या पुरात अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात पाच जण पुरात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे तर भिंत अंगावर पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू बुलढाणा जिल्ह्यात झालेला आहे. याशिवाय १२० वर लहान-मोठ्या गुरांचा मृत्यू पुरामुळे ओढवला आहे. अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे अमरावती जिल्ह्यात ७२ हजार हेक्टर वर सोयाबीन ,तूर ,कपाशी, संत्राचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले...
माळशेज घाट परिसरात आदिवासी बांधव पारंपरिक गाणी गात भात आवणीच्या कामात मग्न असल्याचे मनमोहक दृश्य पाहायला मिळतेय सह्याद्रीच्या हिरव्यागार डोंगररांगा, मुसळधार पाऊस, चिखलाने भरलेली शेती आणि त्यात पारंपरिक गाण्यांच्या तालावर सुरू असलेली भात आवणी…यातून आदिवासी शेतक-यांचे कष्ट, संस्कृती आणि सोबत निसर्गाचा अनोखा संगम साकारला आहे.
अमरावती शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यांतर्गत बापट चौकात शरीफ बेग राशीद बेग या २५ वर्षीय तरुणाची मध्यरात्री हत्या करण्यात आली.. गुंडे शाखने या प्रकरणी दोन आरोपींना अवघ्या दोन तासात ताब्यात घेतले, हत्या का करण्यात आली याचे कारण अद्याप स्पष्ट झाल नाही. पोलिसांनी मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला असता मोठी गर्दी यावेळी होती तर दुसरीकडे अमरावतीमध्ये सातत्याने हत्येच्या घटनेमध्ये वाढ होत आहे
बीडचे विशेष मकोका न्यायालयात आज होणार विशेष सुनावणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या साक्षी पुराव्याच्या स्टेज वरती असून या प्रकरणांमध्ये आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतरही कागदांची जंत्री करण्यात येणार आहे.
आरोपी पक्षाकडून देण्यात आलेल्या अर्जांवर ही न्यायालयात युक्तिवाद होण्याची शक्यता.
डिजिटल इव्हिडन्स ऑडिओ व्हिडिओ यावरही न्यायालयात दोन्ही पक्षाकडून युक्तिवाद होणार.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी.
प्रत्यक्षात साक्षी पुराव्याच्या प्रकरणाला सुरुवात न्यायालयात दोन्ही बाजूचे वकील हजर राहणार असल्याची माहिती.
इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि प्रामुख्याने जातिनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी सकल ओबीसी महामोर्चा'च्या वतीने आजपासून राज्यभरात मंडल यात्रा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेचा शुभारंभ आज भंडारा येथून होणार असून पहिल्या दिवशी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.भंडारा येथून सुरू होणारी ही मंडल यात्रा पहिल्या दिवशी नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतून प्रवास करेल:ओबीसी, व्हीजेएनटी (VJNT) आणि एसबीसी (SBC) बांधव, भगिनी, युवक व विद्यार्थ्यांनी आपल्या हक्क आणि अधिकारांच्या रक्षणासाठी या मंडल यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आले आहे.ओबीसींची जातिनिहाय जनगणना लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि समाजाला त्यांचे योग्य हक्क मिळावेत, हा या मंडल यात्रेचा मुख्य उद्देश आहे.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे टोमॅटो पिकावर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाली असून शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे.
गेल्या काही दिवसापासून पुण्याच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने, भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण 100 टक्के भरले
धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात सुरुवात झालीय
सध्या या 45 स्वयंचलित दरवाजांमधून 3 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदी पात्रात सुरू
पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार..विसर्ग वाढवल्यानं नदीकाठच्या गावांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा
कल्याण–आहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट वाहतुकीसाठी बंद असतानाही पर्यटकांची गर्दी कायम आहे. पर्यायी मार्गावरील वाहतूक कोंडी, प्रशासनाचे नियोजन आणि पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिक नागरिकांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
यवतमाळ जिल्ह्यात यंदा साडेपाच लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली.अशात कपाशीवर मावा, तुडतुडा आणि पांढरीमाशीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.आधीच अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील पिक आणि शेतजमीन खरडून गेली.त्यातच आता कपाशीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडलाय.
पालकमंत्री जयकुमार गोरेंविरोधात अवमानकारक व्यक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा नोंद
भाजपचे सोलापूर महापालिकेचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी दिली संजय राऊत यांच्या विरोधात फिर्याद
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरोधात वक्तव्य करताना संजय राऊत यांनी शिवी दिली होती
त्याविरोधात नगरसेवक मनीष केत यांनी सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिलीय
त्यांच्या फिर्यादीवरून संजय राऊत यांच्या विरोधात BNS कलम 356(2), 352 नुसार गुन्हा नोंद
पुण्यातील चार धरणे मिळून एकूण ९९ टक्के पाणीसाठा
गेल्या वर्षीच्या तुलनेत पुण्यातील सगळे धरणे मिळून ११ टक्के पाणीसाठा जास्त
खडकवासला, पानशेत, वरसगाव १०० टक्के तर टेमघर ९५ टक्के भरलं
धरण पाणलोट क्षेत्रामध्ये झालेल्या दमदार पावसामुळे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली
खडकवासला: १०० टक्के
पानशेत: १०० टक्के
वरसगाव: १०० टक्के
टेमघर: ९५.४५ टक्के
एकूण पाणीसाठा: ९९.४३ टक्के
मागील वर्षी पाणीसाठा (आजच्या तारखेला): ८८.३८ टक्के
मोठमोठ्या व्यासाचे व फूटभर खोलीचे खड्डे आणि उखडलेल्या खडीमुळे पुणे-सोलापूर महामार्गाची चाळण
पुण्यातील हडपसर रविदर्शन ते कवडीपाट टोल नाका या अंतरावर खड्डेच खड्डे
पावसात खड्ड्यांमधून उडणाऱ्या पाण्याने तर पाऊस उघडल्यावर उडणाऱ्या धुळीने प्रवाशांसह स्थानिक नागरिकही हैराण
या मार्गावर वारंवार अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिकांमधून प्रशासनाविरोधात संताप
पुणे शहरातील काळेपडळ भागात अण्णाभाऊ साठे जयंतीच्या दिवशी मध्यरात्री बुलेट आणि इतर दुचाकींच्या मॉडिफाईड सायलेंसरमधून फटाक्यासारखा मोठा आवाज करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांविरोधात काळेपडळ पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. या प्रकरणी १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तब्बल ११ बुलेट जप्त करण्यात आल्या आहेत.
कात्रज भागात असलेल्या ऋतुगंधा सोसायटी मधील लिफ्ट मध्ये काही लोकं अडकल्याची माहिती अग्निशमन दलाला रविवारी संध्याकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. दलाच्या जवानांनी तातडीदने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी लिफ्टमध्ये चार प्रौढ व्यक्ती व अडीच वर्षांचे एक लहान मूल अडकले होते. दलाच्या जवानांनी हायड्रोलिक स्प्रेडर व कटावणीच्या सहाय्याने लिफ्टमध्ये अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.