नाशिकच्या येवला शहर पोलिसांना सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका खाजगी वाहनातून दोधे जण अंमली पदार्थ घेऊन जात असल्याचे समजताच पोलिसांनी विंचूर चौफुली ते शिवसृष्टी परिसरात दोघांना ताब्यात त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून ४ किलो २३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून पोलिसांनी गणेश परदेशी व रितेस पटेल या दोघांना ताब्यात घेतले आहे.तर कारवाई होताच नाळिर येथून तत्काळ फॉरेन्सिक लॅब टीम अधिक तपास करीत आहे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आदर्श आचारसंहिता चार नोव्हेंबर रोजी लागू करण्यात आली, त्यानंतर प्रशासनाकडून सर्व राजकीय पक्षाचे चिन्ह आणि नेत्यांचे फलक, बॅनर काढण्यात आले, मात्र प्रशासनाकडून सूचना देऊन दहा दिवस उलटून देखील अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या बुलढाणा येथील संपर्क कार्यालयावरील बॅनर वर असलेल्या नेत्यांचे फोटो झाकण्यात आले नव्हते, पदवीधर आमदाराकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आदर्श आचारसंहितेचा भंग केला जात असल्याची बातमी साम टीव्ही ने दाखवली होती, याची जिल्हा प्रशासनाने दखल घेत तात्काळ हे बॅनर झाकत कारवाई करण्यात आली आहे...
नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगर पालिका लढवणार एम आय एम...
पक्ष निरीक्षकांनी 40 हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती....
शहादा आणि नंदुरबार नगरपरिषदेत देणार एमआयएमचा नगराध्यक्ष....
एमआयएमचे निरीक्षक शारेक नक़्शबंदी यांनी घेतल्या मुलाखती..
नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा परिवार वादामुळे इतर समाजाला पुढे येऊ दिला जात नाही...
एक दोन परिवाराने दिल्यावर ताबा घेतला असून त्यामुळे जिल्ह्यात कुठल्याही विकास काम होत नाही..
करोडो रुपयांचे फंड हे राज्य शासनाकडून मंजूर करून आणतात मात्र प्रत्यक्षात नगरपालिकांमध्ये त्यांचे कुठलंही विकास कामे दिसत नाही..
महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणग्रस्त शेतकरी, भूमिहीन शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी चौफुली येथे सत्याग्रह जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते, मात्र तहसीलदार सुनील पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शासनाने त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.. यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्त लावण्यात आला होता...
रत्नागिरी - तिसऱ्या भाषेच्या सक्ती संदर्भातला डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा जो अहवाल आहे तो 20 डिसेंबरला येणार आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी लोकांची मतं आजमावली आहेत असं ते म्हणतात
तिसऱ्या भाषेच्या सक्तीला लोकांचा प्रचंड विरोध आहे हे स्पष्ट आहे
ही गोष्ट अत्यंत स्वयं स्पष्ट होती आणि त्यामुळे खरंतर यासाठी समितीची अजिबातच गरज नव्हती हे आम्ही याच्या आधी म्हटलेलं होतं
नरेंद्र जाधव यांच्या समितीचा जो अहवाल येईल त्याच्या अगोदर 21 नोव्हेंबरला गिरीश सामंत आणि डॉक्टर प्रकाश परब यांनी संपादित केलेली पुस्तिका आम्ही प्रसिद्ध करतोय
ज्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्ती बद्दलच्या आंदोलनाची आमची संपूर्ण भूमिका आहे
तिसरी भाषा का नको? भाषा शास्त्राच्या अंगाने, शिक्षण शास्त्र, मानसशास्त्राच्या अंगाने का नको? हे आम्ही स्पष्टपणे सांगतो
अहवाल बनवणारे लोक लोकांच्या मताचा अंदाज घेण्यासाठी एक प्रकारची भूमिका मांडतात आणि नंतर काही वेगळंच सांगतात
नरेंद्र जाधवांच्या अहवालामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती असेल तर त्याला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती पुन्हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळेच्या पातळीवर प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर आम्ही होऊ देणार नाही
पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
ट्रॅक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात करण्यात आला गुन्हा दाखल
रुस्तम वृद्धार खान (ट्रकचालक) (वय ३५ रा. राजस्थान) मुश्ताक हनीफ खान (क्लिनर) दोघेही मयत (वय ३१, रा. राजस्थान) ताहीर नसीर खान वय 45 राजस्थान
या तिघांवर गुन्हा दाखल
या अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी आहेत
अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत
बाह्य यंत्रणांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांवर आरोप लावून त्यांना त्रास दिला जात आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना विनाकारण अडकवले जात आहे.
त्यामुळे आमची ओळख टिकवून ठेवण्यासाठी 'वर्क टू रूल' अर्थात ड्युटी आहे तेवढेच काम करून अतिरिक्त काम न करण्याचा इशारा देणारे फलक रेल्वे कर्मचारी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लावले आहेत.
व्हीजेटीआय अहवालावरून मुंब्रा दुर्घटनेबद्दल दोन रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर हा गुन्हा चुकीचा असून, तो रद्द करावा, अशी मागणी करत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने ६ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी स्थानकावर मोटरमन लॉबीसमोर ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन केले. परिणामी, तासभर लोकल सेवा बंद झाली.
यामध्ये दोषी ठरवून सीआरएमएसच्या दोन पदाधिकाऱ्यांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यावर सीआरएमएसने आक्रमक पवित्रा घेत रेल्वे प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा लोकल वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्राची स्थापना
जिल्ह्यातील १४ नगरपरिषद व ३ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या तक्रार निवारणबाबत केंद्राचा ०२०-२६०६१७०५ दूरध्वनी क्रमांक आहे. संबंधितांनी या क्रमांकावर संपर्क साधून निवडणुकीसंदर्भातील आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन नगरपालिका प्रशासन शाखेच्या प्र.जिल्हा सह आयुक्त यांनी केले आहे.
नगरपरिषद निवडणुका शांततेत निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश
यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या दोघांनी चक्क डिपॉझिट रक्कम भरण्यासाठी एक,दोन आणि.पाच रूपयांचे कलदार आणले अन् अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली.मनोज गेडाम आणि समाधान रंगारी असे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे आहेत.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या दोघांनी डिपॉझिट रक्कम म्हणुन चिल्लर पैसे आणून टेबल वर ठेवल्याने यावेळी अनेकांना हसा पिकल्या मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत आरबीआयच्या निर्देशानुसार केवळ दीड हजार रूपये चिल्लर स्वीकारल्या जातील असे म्हटल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी चिल्लर पैसे ऐवजी पाचशेच्या नोटा डिपॉझिट म्हणून भरली.
सांगलीच्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून महायुतीकडून मंत्री उदय सामंत कडून भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षाकडून नगराध्यक्ष पद शिवसेनेला मिळाले असून, या पदासाठी पृथ्वीसिंग नाईक हे “धनुष्यबाण” निशाणीवर निवडणूक लढवणार आहेत. ही उमेदवारी मंत्री उदय सामंत यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. महायुतीतून हे पद शिवसेनेच्या वाट्याला आले असून, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या घोषणेनंतर शिराळा तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगरपरिषद निवडणूकी करीता भाजपाकडुन नगराध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन चालुक्य यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद येरमे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे दाखल केला आहे.महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपने मुहुर्त साधत शक्तीप्रदर्शन करीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यासमवेत नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला.तर नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी नगरसेवक पदासाठी आत्तापर्यंत आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान ऊस दरासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रूपये मिळावी या मागणीसाठी ऊस वाहतूक रोखली आहे.
माळशिरस तालूका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
माळशिरस तालुक्यातून अनेक साखर कारखान्यांना ऊस जातो.
शेकडो ऊसाची वाहने अडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी (कार्तिकी यात्रा) सोहळाच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरीता वापरण्यास मनाई करण्यातबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरीता वापरण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे तथापि, ते पाणी भांडी घासणे वा तत्सम अन्य कारणासाठी वापरता येईल. तसेच आळंदीतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतीही कपडे धुवू नयेत, अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करु नये. सदर दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील पाणी पुरवठ्याचा तब्बल २४ कोटी रुपयांचा निधी वळवण्यात येणार
या निधीतून जुन्या हद्दीतील पाणी पुरवठ्याची कामे केली जाणार आहेत.
पाणीपुरवठा विभागासह इतर विभागांच्या विविध प्रकल्पांसाठी निधी अपुरा पडत असल्याने एकूण ५२ कोटींच्या विविध तरतुद वळवली जाणार आहे.
वित्तीय समितीची मान्यता घेण्यात आली आहे.समाविष्ट गावात महापालिका कर जास्त घेते पण विकास कामे करत नाही. रस्ते,पाणी, विद्युत व्यवस्था, कचरा व्यवस्थापन केले जात नाही.
विकास निधीवरून पुन्हा वाद पेटला
२०१७ आणि २०२१ मध्ये ३२ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, समावेशानंतरही विकासकामे न झाल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांनी महापालिकेतून बाहेर पडून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी केली होती. शासनाने ती मागणी मान्य केली आणि दोन्ही गावे वेगळी केली.त्यानंतर उर्वरित गावांमधूनही नाराजीचा सूर कायम आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने बजावला समन्स
24 तासात चौकशीसाठी हजर राहण्याचे उन्मेष पाटलांना आदेश
देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या 5 कोटी 33 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेचे चौकशीसाठी हजर राहण्याच्या आदेश
नगरपालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या अडचणीत वाढ झाल्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
कंपनीत माझा कुठलाही भाग बसताना, माझ्यावर राजकीय देशातून गुन्हा दाखल
पार्थ पवार गिरीश महाजन यांच्यावर भूखंडा संदर्भात आरोप असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
- नव्या निर्णयानुसार 29 महानगरपालिकांसाठी प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर ऐवजी 20 नोव्हेंबरला केली जाणार प्रसिद्ध
- या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर असणार
- 27 नोव्हेंबर पर्यंत दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी पाच डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील
- 8 डिसेंबर रोजी या याद्या मतदार केंद्राच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील 12 डिसेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार.
वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत निवडणूकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सदस्य पदासाठी 19 नामांकन अर्ज दाखल केले असून, यात अध्यक्ष पदासाठी केवळ 2 नामांकन दाखल करण्यात आले आहेत. यात सदस्य पदासाठी सर्वाधिक अर्ज हे वाशीम नगर परिषदेकरीता आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रिसोड नगर परिषदेमध्ये 6 नामांकन दाखल करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये खोडा घालण्याचे काम तटकरे कुटुंबीय करत आहेत असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे त्यांनी जो प्रयोग केलाय त्यापेक्षा चांगला प्रयोग आम्ही करू शकतो असा सूचक इशाराही आमदार दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला दिला आहे. रायगड जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांना बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती करण्याची भूमिका घेतली आहे त्यावर ते बोलत होते. राष्ट्रवादीला सोबत घेऊन जाण्याची भूमिका नेहमीच भाजपची राहिली आहे. आम्ही जर कुणाबरोबर गेलो तर बाकीच्यांनी त्यावर विचार करू नये. आम्ही सुद्धा असे प्रयोग करू शकतो परंतु आम्ही युतीचा सन्मान ठेवून जाण्याचा प्रयत्न करत आहोत असं महेंद्र दळवी म्हणाले.
पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू
मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांपैकी ५ पुरुष २ महिला आणि १ लहान मुलीचा समावेश
अपघातात १५ जणं जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू
फॉरेन्सिक पथकाकडून अपघातस्थळाची पाहणी आणि पंचनामा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.