आंतरराष्ट्रीय बाजारमूल्य 17.18 कोटी रुपये
टांझानियाची महिला प्रवासी अटक, एंटेबे (युगांडा)हून आली होती
बॅगेत फूड पॅकेट्स, कंटेनर, पाउच व पेलिट्समध्ये कोकेन लपवलेले
प्रवासी महिलेने गिळलेल्या दोन कॅप्सुल्समधूनही कोकेन हस्तगत
NDPS फील्ड टेस्ट किटमध्ये कोकेनची पुष्टी
पिंपरी चिंचवड शहरातील दिघी पोलीस स्टेशन हद्दीत नितीन शंकर गिलबिले या 37 वर्षाच्या युवकाची बंदुकीतून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. नितीन शंकर गिलबिले ची हत्या झाल्यानंतर त्याच्या हत्येच्या कटात सहभागी असलेले काही मारेकरी हे काळा रंगाच्या फॉर्चूनर ने पसार झाले होते या आरोपींना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने पथकाने तामिनी घाट आणि पौंड रोड येथे पाठलाग करून बेड्या ठोकल्या आहेत. विक्रांत सुरेश ठाकूर वय 38 वर्ष आणि सुमित फुलचंद पटेल वय 31वर्षे या दोन आरोपींना सध्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर गुन्ह्यात मुख्य आरोपी असलेला अमित जीवन पठारे हा आरोपी अजूनही फरार आहे. या दोन्ही आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी एम एच 14 एल एल 8900 ही काळया रंगाची फॉर्चूनर कार आणि एक विवो कंपनीचा मोबाईल जप्त केला आहे.
पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणी अपडेट
पुणे पोलिसांची शीतल तेजवानीला नोटीस
चौकशीसाठी हजर राहण्यासाठी तेजवानीला नोटीस
पुणे पोलिसांची तेजवणीच्या पिंपरी चिंचवड येथील घरावर आणि मुंबईतील कार्यालयाला नोटीस
राजवीर कोतकर असे जखमी मुलाचे नाव..
जखमी राजवीरवर नगरच्या खाजगी रुग्णालात उपचार सुरू..
घराच्या अंगणात जनावरांना चारा टाकत असताना बिबट्याने केला हल्ला..
सायंकाळी सातच्या सुमारास घडली घटना..
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचा पाचव्या मजल्यावरून उडी टाकून जीव देण्याचा प्रयत्न
मोहन पवार असे या व्यक्तीचे नाव आहे.
शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग व्यवहारातील सेल डीड अखेर कायदेशीर रित्या रद्द करण्यास पुणे दिवाणी न्यायालयाने शिक्कामोर्तब केला. एच एन डी जैन बोर्डिंग व गोखले एल एल पी यांच्या मध्ये या सार्वजनिक स्मारक ट्रस्ट ची तीन एकर भूखंड जागा २३१ कोटी रुपयांना विक्री करण्या बाबत खरेदी खत नोंदविण्यात आले होते. या बाबत राज्याचे धर्मदाय आयुक्त यांनी खरेदी खत दस्त रद्द व्हावे यासाठी पुणे येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला.
- नाशिकच्या वनविहार कॉलनी परिसरात आणखी एक बिबट्या असल्याची शक्यता
- वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून रेस्क्यू सुरू
- ज्या घरात सुरुवातीला बिबट्या घुसला तिथे दुसरा बिबट्या असण्याची भीती
पुणे पोलिस, पी एम आर डी ए, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पी डब्ल्यू डी, पुणे महापालिका आणि आर टी ओ या विभागातील अधिकारी राहणार उपस्थित
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईच्या बोरीवली पूर्वेकडील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच वनराणी मिनी ट्राय ट्रेनचा डबल धमाका पर्यटकांना अनुभवता येणार आहे.केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या प्रयत्नांना यश आले असून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ‘वन राणी’ टॉय ट्रेन पुन्हा एकदा धावणार! असून सध्या तिची चाचणी सुरू आहे. विंटेज मिनी ट्राय ट्रेन आणि नवीन व्हिस्टाडोम टॉय ट्रेनची चाचणी सुरू असून पारदर्शक छत आणि मोठ्या खिडक्यांसह आकर्षक सफर लवकरच मुंबईकर पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
अमली पदार्थांच्या वाहतुकी प्रकरणी उल्हासनगर क्राईम ब्रँचने मोठी कारवाई करत बदलापूरच्या वालीवली परिसरातून 24 किलो गांजा जप्त केलाय. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना अटक केली असून दुचाकीही जप्त केलीये.
कल्याणच्या आडिवली परिसरातील महिलांचा संताप उफाळला, केडीएमसी मुख्यालयाबाहेर अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक ‘श्राद्ध’ करून जोरदार आंदोलन
टॅक्स भरतो, मग रस्ता कुठे? या संतप्त घोषणांनी आज केडीएमसी मुख्यालय परिसर दणाणून गेला. आडिवली परिसरातील खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या आई एकविरा महिला मंडळा तर्फे महापालिका अधिकाऱ्यांविरोधात अनोखे आंदोलन छेडण्यात आले. मंडळाच्या सदस्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी एकत्र येत अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक श्राद्ध घालून निषेध व्यक्त केला.
बिहारच्या निवडणुकीत NDA ला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील शिवाजी चौकात भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने जल्लोष करण्यात येत आहे. ढोल ताशे, फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून कार्यकर्ते जल्लोष करत आहेत.
जैन बोर्डिंग व्यवहारातील सेल डीड कायदेशीर रित्या रद्द करण्यास परवानगी
पुणे दिवाणी न्यायालयाचा निकाल
शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट व गोखले एल एल पी यांच्या मधे या सार्वजनिक स्मारक ट्रस्ट ची तीन एकर भूखंड जागा २३१ कोटी रुपयांना विक्री करण्या बाबत खरेदी खत नोंदविण्यात आले होते
हा व्यवहार बेकायदेशीर असल्या बाबत आचार्य श्री गुप्तिनंदी जी महाराज यांच्या मार्गदर्शनखाली मोठे आंदोलन करण्यात आले.
ट्रस्ट व गोखले बिल्डर यांनी खरेदी खत दस्त रद्द व्हावे यासाठी पुणे येथील दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता
त्यावर आज न्यायाधीश श्री एन आर गजभिये यांनी सुनावणी घेत सदर व्यवहार रद्द बातल झाल्याने खरेदी खत दस्त रद्द करणे कामी आदेश दिले
सीएसएमटी स्थानकाबाहेर डेपोजवळ सापडली अज्ञात बॅग.
पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात.
बॉम पथक दाखल.
तपास सुरू
* पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी धडकले अमरावती विद्यापीठावर...
* विद्यार्थी परिषदेच विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल आंदोलन सुरू...
* घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त...
* विद्यार्थ्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते, कुलसचिव डॉ.अविनाश असणारे, डॉ. महेंद्र ढोरे पोहोचले विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर...
शिक्षणाची राजधानी पुण्याला का म्हणतात याचे एक उत्तम उदाहरण. पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी इस्रोच्या भेटीनंतर आता 10 दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यासाठी 25 विद्यार्थ्यांची निवड झाली असून, ते वॉशिंग्टन, ऑरलॅंडो आणि सॅन फ्रान्सिस्को या तीन शहरांना भेट देणार आहेत. आज हे सर्व विद्यार्थी अमेरिकेच्या दिशेने निघाले आहेत. पुणे मॉडेल स्कूल' प्रकल्पांतर्गत आयोजित या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थी वॉशिंग्टन डी.सी. येथे तीन दिवस राहणार आहेत. ते नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियम, अर्थ इन्फॉर्मेशन सेंटर, तसेच नासा मुख्यालयाला भेट देणार आहेत. आज या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी पुण्यातील विधान भवनात एक कार्यक्रम पार पडला. यावेळी या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते.
वारंवार नवले पुलावरती अपघात होत आहेत फक्त त्याची पाहणी केली जाते.
उपायोजना काही होत नाही याचा निषेध करण्यासाठी तीरडी आंदोलन करण्यात आलं
नितीन गिलबिले हत्येप्रकरणी आरोपी मित्र विक्रांत ठाकूरला पुणे ग्रामीण पोलिसांनी लोणावळ्यातील अँबीव्हॅली इथून ताब्यात घेतलं आहे.
- आज माझा भाजपात प्रवेश झाला
- बिहारच्या विजयाने शुभ संकेत मिळाले आहे
- पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्या कामाने प्रभावित झालो
- सिन्नरच्या विकासाबाबत मला शब्द दिला
- मला शुभेच्छा दिल्या स्वागत केले त्याबद्दल मी आभारी
- गल्ली ते दिल्ली तिकडे उपयोग नाही
- भाजप शिवाय पर्याय नाही
भारतीय जनता पक्षावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल बिहारमधील जनतेचे मनःपूर्वक आभार व्यक्त करताना, हा विजय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांची गरीब आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी केलेली सातत्यपूर्ण कार्यशैली, 'सबका साथ, सबका विकास सबका vishvaas' या धोरणाची जनतेने दिलेली मोठी दाद आहे. फेक नेरीटिव्ह ला जनता साथ देत नाही हे यावरून समजलं. मुख्यमंत्री कुणाचा हे नेते बसून ठरवतील. लोकांना विकास हवा आहे आणि तो या निकालावरून स्पष्ट झाला आहे. याबाबत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याबरोबर बातचीत केले आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी.
- मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपचा जल्लोष
- नाशिकच्या भाजप कार्यालयाबाहेर भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जल्लोष
- फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशाच्या तालावर एकमेकांना पेढे भरवून विजयोत्सव
- मंत्री गिरीश महाजन देखील जल्लोषात सहभागी
बिहारच्या निवडणुकीत एनडीए चा मोठा विजय झाल्याने हिंगोलीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे हिंगोली शहरातील गांधी चौक परिसरात ढोल ताशाच्या गजरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी देखील केली होती दरम्यान यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी सह अमित शहांच्या नावाने विजयी घोषणा देखील देण्यात आल्या.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील महालगाव येथे भरलेल्या सुप्रसिद्ध बैल बाजारात यंदा उच्चांक भावाची नोंद झाली. शेतकरी रामनाथ बाजारे पाटील यांच्या चार वर्षे वयाच्या एकवर्णी ‘सर्जा-राजा’ या जोडीच्या बैलांचा तब्बल ५ लाख ११ हजार रुपयांना झालेला व्यवहार सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. बाजारात जोडी दाखल होताच ढोल-ताशांच्या गजरात आणि उपस्थित गावकऱ्यांच्या जल्लोषात त्यांचे पारंपरिक स्वागत करण्यात आले. बैलांची देहबांधणी, तंदुरुस्ती, समांतर चाल आणि शेतकामातील क्षमता पाहण्यासाठी शेतकरी जमा झाले होते. सर्जा-राजा जोडीची गुणवत्ता पाहून अनेकांनी रस दाखवला; मात्र अखेरीस अन्वर शेख (अन्तापूर, ता. सटाणा, जि. नाशिक) यांनी ही जोडी ५ लाख ११ हजार रुपयांवर आपल्या नावे केली. महालगावच्या बैल बाजारात यापूर्वीही चांगल्या व्यवहारांची नोंद झाली असली तरी यंदाचा भाव हा विशेषतः उच्चांक ठरल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. बाजारातील या विक्रीमुळे शेतकरी आणि पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी आज हिंगोली मध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सर्वच उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी हिंगोली शहरातून भव्य मिरवणूक काढत मोठे शक्ती प्रदर्शन करत हे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत दरम्यान सुरुवातीपासून सोहळा चा नारा देणाऱ्या संतोष बांगर यांनी आपल्या वहिनी रेखा श्रीराम बांगर यांचा नगराध्यक्ष पदासाठी देखील नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने राष्ट्रवादी भाजप सह महायुती होण्याची आशा मावळली आहे त्यामुळे भाजपकडून आता हिंगोली पालिकेत दुसऱ्यांदा सत्ता मिळवण्यासाठी काय रणनीती ठरविण्यात येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.
बिहारमध्ये भाजपाची एकाची सत्ता आल्यानंतर सांगलीमध्ये भाजपच्या वतीने जल्लोष करण्यात आला आहे.उरुण ईश्वरपूर या ठिकाणी भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपच्या वतीने हा जल्लोष केला आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावेळी लाडू वाटप करत भाजपाने मिळवलेल्या विजया बद्दल आनंदोत्सव साजरा केला आहे .
- बिहार निवडणुकीत NDAला मिळालेल्या विजयाबद्दल नागपूरात भाजप युवामोर्चाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष.
- भारत माता चौकात फटाके फोडून भारत मातेला पुष्पहार अर्पण करून साजरा केला जल्लोष
- बिहार मधील जनतेने भाजपला भरभरून मतदान केल्याबद्दल बिहारच्या जनतेचे मानले आभार
- भारत माता चौक परिसरात बिहारी लोकांचे वास्तव्य असल्याने भागात भाजप कार्यकर्ते विजयाच्या उत्साहात
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नाट्यमय घडामोडीनंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सभापती वर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आहे. या बाजार समितीत 18 सदस्य संख्या असून यापूर्वी माजी आमदार दिलीप सानंदा यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी अजित पवार गटाचा सभापती होता मात्र काँग्रेसने राजकीय खेळी करून यातील सदस्यांना हाताशी धरून तेरा विरुद्ध एक असा अविश्वास ठराव पारित केला आहे त्यामुळे यापूर्वी 25 वर्षापासून माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या वर्चस्वाला व अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आजच्या विशेष अविश्वास ठराव सभेसाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नवले ब्रिजवर झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर 22 जण जखमी आहेत
ट्रक ड्रायव्हर क्लीनर आणि मालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यातील दोघे मयत आहेत तर मालकाच्या तपास सुरू आहे
या दोन्ही गाड्या ओव्हरलोड होत्या चालकाचे नियंत्रण सुटला असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे आणि कुठलीही परवा न करता भरधाव गाडी चालवले असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे
यामध्ये एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला आहे सगळी प्रक्रिया पूर्ण करून बॉडी त्यांच्या ताब्यात देण्यात आली आहे आणि पुढील तपास सुरू आहे
पोखरी घाटात दुचाकीस्वाराने भाविकांच्या गाडीला कट मारल्या अपघात झाला
या अपघात ३ जण गंभीर जखमी तर १३ जखमी जखमी असुन जखमींवर घोडेगाव मंचर येथील रुग्णालयात उपचार सुरु
जालना जिल्ह्यातुन आळंदी आणि भिमाशंकर देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील आर्यावर्त प्रायव्हेट लिमिटेड केमिकल कंपनीला अचानक आज सकाळच्या सुमारास आग लागली असून आग इतकी भीषण आहे की आगीचे लोड हे दोन ते तीन किलोमीटर वरून नागरिकांना दिसत असून या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नेमकी आग कशी लागली याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही तरी जळगाव महानगरपालिकेच्या अग्निशामक बंबाने ही आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे
बिहार चा विजय निश्चित होता, विकासाची ही पावती आहे.. तिथला गुन्हेगारी कमी केली. बिहारी कामाला इतरत्र जायचे ते आता तिथं थंबतात, मतदान यादीत अडचणी होतात तिथं ही झालं असेल मात्र तो मुद्दा वेगळा होता, हे मूळ मतदार आहेत. भाजप नितीश कुमार सत्तेचे योग्य विभाजन करतील रामविलास पासवान यांच्या मुलाला ही सत्ता मिळेल, पराभव झाला की ईव्हीएम बाबत टिमकी मिरवणार, असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय
पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे, काल रात्री काही गाव गुंडांनी वाल्हेकरवाडी येथील दगडोबा चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली आहे. कोयता, लाठी काठी आणि दगडाने गाव गुंडांनी जवळपास नऊ दहा वाहनांची तोडफोड केली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी मध्य धुंद गाव गुंडांनी वाहनांची तोडफोड केली आहे. या प्रकरणात स्थानिक नागरिकांनी चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून वाहनांची तोडफोड करणाऱ्या गावंडांचा शोध चिंचवड पोलीस आता युद्ध पातळीवर घेत आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर बदलापूरात भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळतीय. दोन्ही पक्ष एकमेकांचे कार्यकर्ते पळवत असल्याचं चित्र सध्या शहरात दिसून येतंय. यातच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत बदलापुरात शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात भाजपाचे माजी नगरसेवक अविनाश भोपी यांच्यासह शहरातील शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. भाजप आता भाजप राहिली नसून जुन्या राष्ट्रवादीने पक्षावर कब्जा केला असल्याची टीका यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी केली.
संपूर्ण राज्यातुन बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्त वावर आणि हल्ल्याच्या बातम्या पहावयास मिळत आहेत. ज्यामुळे बिबट्यांची दहशत पसरली आहे. अशातच रायगडच्या माणगावमध्ये मुख्य रस्तावर बिबट्यांच्या मुक्त संचारा पाहयाला मिळत आहे. निजामपुर विभागातील जीते गाव परिसरातील हा व्हिडीओ येथील ग्रामस्थाने चित्रीत केला आहे. रस्तावर वावरणाऱ्या या बिबट्यांमुळे रात्रीच्या वेळी चालत अथवा दुचाकीवरून जाणाऱ्या ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जीते गावच्या रस्त्यावर बिबट्यांचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत असून यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ घटनास्थळी येणार
मुरलीधर मोहोळ नवले पुलावर करणार पाहणी
महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्यासह मुरलीधर मोहोळ घेणार नवले पुलाचा आढावा
महानगरपालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी एकत्रित करणार नवले पुलाची पाहणी
काल रात्री याच ठिकाणी भीषण अपघात झाला होता
आज केंद्रीय राज्यमंती आणि सगळे अधिकारी घटनास्थळाची करणार पाहणी
नाशिकच्या येवला शहर पोलिसांना सकाळच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एका खाजगी वाहनातून दोधे जण अंमली पदार्थ घेऊन जात असल्याचे समजताच पोलिसांनी विंचूर चौफुली ते शिवसृष्टी परिसरात दोघांना ताब्यात त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून ४ किलो २३० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून पोलिसांनी गणेश परदेशी व रितेस पटेल या दोघांना ताब्यात घेतले आहे.तर कारवाई होताच नाळिर येथून तत्काळ फॉरेन्सिक लॅब टीम अधिक तपास करीत आहे
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात आदर्श आचारसंहिता चार नोव्हेंबर रोजी लागू करण्यात आली, त्यानंतर प्रशासनाकडून सर्व राजकीय पक्षाचे चिन्ह आणि नेत्यांचे फलक, बॅनर काढण्यात आले, मात्र प्रशासनाकडून सूचना देऊन दहा दिवस उलटून देखील अमरावती पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांच्या बुलढाणा येथील संपर्क कार्यालयावरील बॅनर वर असलेल्या नेत्यांचे फोटो झाकण्यात आले नव्हते, पदवीधर आमदाराकडून निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आदर्श आचारसंहितेचा भंग केला जात असल्याची बातमी साम टीव्ही ने दाखवली होती, याची जिल्हा प्रशासनाने दखल घेत तात्काळ हे बॅनर झाकत कारवाई करण्यात आली आहे...
नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगर पालिका लढवणार एम आय एम...
पक्ष निरीक्षकांनी 40 हून अधिक इच्छुक उमेदवारांच्या घेतल्या मुलाखती....
शहादा आणि नंदुरबार नगरपरिषदेत देणार एमआयएमचा नगराध्यक्ष....
एमआयएमचे निरीक्षक शारेक नक़्शबंदी यांनी घेतल्या मुलाखती..
नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय नेत्यांचा परिवार वादामुळे इतर समाजाला पुढे येऊ दिला जात नाही...
एक दोन परिवाराने दिल्यावर ताबा घेतला असून त्यामुळे जिल्ह्यात कुठल्याही विकास काम होत नाही..
करोडो रुपयांचे फंड हे राज्य शासनाकडून मंजूर करून आणतात मात्र प्रत्यक्षात नगरपालिकांमध्ये त्यांचे कुठलंही विकास कामे दिसत नाही..
महसूल आणि वन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमणग्रस्त शेतकरी, भूमिहीन शेतकरी यांच्या विविध मागण्यांसाठी भूमिमुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी चौफुली येथे सत्याग्रह जेलभरो आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.. या आंदोलनासाठी जिल्ह्यातील शेकडो शेतकरी रस्त्यावर उतरले होते, मात्र तहसीलदार सुनील पाटील यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून शासनाने त्यांच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.. यावेळी पोलिसांच्या चोख बंदोबस्त लावण्यात आला होता...
रत्नागिरी - तिसऱ्या भाषेच्या सक्ती संदर्भातला डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या समितीचा जो अहवाल आहे तो 20 डिसेंबरला येणार आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे
महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जाऊन त्यांनी लोकांची मतं आजमावली आहेत असं ते म्हणतात
तिसऱ्या भाषेच्या सक्तीला लोकांचा प्रचंड विरोध आहे हे स्पष्ट आहे
ही गोष्ट अत्यंत स्वयं स्पष्ट होती आणि त्यामुळे खरंतर यासाठी समितीची अजिबातच गरज नव्हती हे आम्ही याच्या आधी म्हटलेलं होतं
नरेंद्र जाधव यांच्या समितीचा जो अहवाल येईल त्याच्या अगोदर 21 नोव्हेंबरला गिरीश सामंत आणि डॉक्टर प्रकाश परब यांनी संपादित केलेली पुस्तिका आम्ही प्रसिद्ध करतोय
ज्यामध्ये तिसऱ्या भाषेच्या सक्ती बद्दलच्या आंदोलनाची आमची संपूर्ण भूमिका आहे
तिसरी भाषा का नको? भाषा शास्त्राच्या अंगाने, शिक्षण शास्त्र, मानसशास्त्राच्या अंगाने का नको? हे आम्ही स्पष्टपणे सांगतो
अहवाल बनवणारे लोक लोकांच्या मताचा अंदाज घेण्यासाठी एक प्रकारची भूमिका मांडतात आणि नंतर काही वेगळंच सांगतात
नरेंद्र जाधवांच्या अहवालामध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती असेल तर त्याला शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती पुन्हा रस्त्यावर उतरून विरोध करेल आणि कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळेच्या पातळीवर प्राथमिक शिक्षणाच्या पातळीवर आम्ही होऊ देणार नाही
पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
ट्रॅक चालक, मालक आणि क्लीनर विरोधात करण्यात आला गुन्हा दाखल
रुस्तम वृद्धार खान (ट्रकचालक) (वय ३५ रा. राजस्थान) मुश्ताक हनीफ खान (क्लिनर) दोघेही मयत (वय ३१, रा. राजस्थान) ताहीर नसीर खान वय 45 राजस्थान
या तिघांवर गुन्हा दाखल
या अपघातात 8 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी आहेत
अधिक तपास सिंहगड रोड पोलिस करत आहेत
बाह्य यंत्रणांकडून रेल्वे कर्मचाऱ्यांवर आरोप लावून त्यांना त्रास दिला जात आहे. तसेच रेल्वे कर्मचाऱ्यांना विनाकारण अडकवले जात आहे.
त्यामुळे आमची ओळख टिकवून ठेवण्यासाठी 'वर्क टू रूल' अर्थात ड्युटी आहे तेवढेच काम करून अतिरिक्त काम न करण्याचा इशारा देणारे फलक रेल्वे कर्मचारी संघटनेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर लावले आहेत.
व्हीजेटीआय अहवालावरून मुंब्रा दुर्घटनेबद्दल दोन रेल्वे अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यानंतर हा गुन्हा चुकीचा असून, तो रद्द करावा, अशी मागणी करत सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने ६ नोव्हेंबर रोजी सीएसएमटी स्थानकावर मोटरमन लॉबीसमोर ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन केले. परिणामी, तासभर लोकल सेवा बंद झाली.
यामध्ये दोषी ठरवून सीआरएमएसच्या दोन पदाधिकाऱ्यांवर रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
गुन्हा दाखल झाल्यावर सीआरएमएसने आक्रमक पवित्रा घेत रेल्वे प्रवाशांना वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पुन्हा लोकल वाहतूक ठप्प होण्याची शक्यता आहे
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार निवारण केंद्राची स्थापना
जिल्ह्यातील १४ नगरपरिषद व ३ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासन शाखा,जिल्हाधिकारी कार्यालय येथे तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आला आहे.
निवडणुकीच्या तक्रार निवारणबाबत केंद्राचा ०२०-२६०६१७०५ दूरध्वनी क्रमांक आहे. संबंधितांनी या क्रमांकावर संपर्क साधून निवडणुकीसंदर्भातील आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन नगरपालिका प्रशासन शाखेच्या प्र.जिल्हा सह आयुक्त यांनी केले आहे.
नगरपरिषद निवडणुका शांततेत निर्भयपणे पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश
यवतमाळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या दोघांनी चक्क डिपॉझिट रक्कम भरण्यासाठी एक,दोन आणि.पाच रूपयांचे कलदार आणले अन् अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांत एकच खळबळ उडाली.मनोज गेडाम आणि समाधान रंगारी असे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची नावे आहेत.यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपविभागीय कार्यालयात नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या दोघांनी डिपॉझिट रक्कम म्हणुन चिल्लर पैसे आणून टेबल वर ठेवल्याने यावेळी अनेकांना हसा पिकल्या मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नियमावर बोट ठेवत आरबीआयच्या निर्देशानुसार केवळ दीड हजार रूपये चिल्लर स्वीकारल्या जातील असे म्हटल्यानंतर दोन्ही उमेदवारांनी चिल्लर पैसे ऐवजी पाचशेच्या नोटा डिपॉझिट म्हणून भरली.
सांगलीच्या शिराळा नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला वगळून महायुतीकडून मंत्री उदय सामंत कडून भाजप, शिवसेना आणि मित्र पक्षाकडून नगराध्यक्ष पद शिवसेनेला मिळाले असून, या पदासाठी पृथ्वीसिंग नाईक हे “धनुष्यबाण” निशाणीवर निवडणूक लढवणार आहेत. ही उमेदवारी मंत्री उदय सामंत यांनी अधिकृतपणे जाहीर केली आहे. महायुतीतून हे पद शिवसेनेच्या वाट्याला आले असून, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या घोषणेनंतर शिराळा तालुक्यात शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा नगरपरिषद निवडणूकी करीता भाजपाकडुन नगराध्यक्ष पदासाठी हर्षवर्धन चालुक्य यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद येरमे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कडे दाखल केला आहे.महायुतीचे घटक पक्ष असलेल्या भाजपने मुहुर्त साधत शक्तीप्रदर्शन करीत पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यासमवेत नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला.तर नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी नगरसेवक पदासाठी आत्तापर्यंत आठ अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान ऊस दरासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊसाला पहिली उचल साडेतीन हजार रूपये मिळावी या मागणीसाठी ऊस वाहतूक रोखली आहे.
माळशिरस तालूका अध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभीमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
माळशिरस तालुक्यातून अनेक साखर कारखान्यांना ऊस जातो.
शेकडो ऊसाची वाहने अडकल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी (कार्तिकी यात्रा) सोहळाच्या पार्श्वभूमीवर २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत इंद्रायणी नदीच्या दोन्ही तीरावरील पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरीता वापरण्यास मनाई करण्यातबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यासह स्वयंपाकाकरीता वापरण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे तथापि, ते पाणी भांडी घासणे वा तत्सम अन्य कारणासाठी वापरता येईल. तसेच आळंदीतील ठिकठिकाणी असलेल्या सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या नळाचे पाणी पिण्यासाठी वापरावे. इंद्रायणी नदीच्या पात्रात कोणतीही कपडे धुवू नयेत, अगर कोणत्याही प्रकारे नदीचे पाणी दूषित होईल असे कृत्य करु नये. सदर दूषित पाणी पिल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.
पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावातील पाणी पुरवठ्याचा तब्बल २४ कोटी रुपयांचा निधी वळवण्यात येणार
या निधीतून जुन्या हद्दीतील पाणी पुरवठ्याची कामे केली जाणार आहेत.
पाणीपुरवठा विभागासह इतर विभागांच्या विविध प्रकल्पांसाठी निधी अपुरा पडत असल्याने एकूण ५२ कोटींच्या विविध तरतुद वळवली जाणार आहे.
वित्तीय समितीची मान्यता घेण्यात आली आहे.समाविष्ट गावात महापालिका कर जास्त घेते पण विकास कामे करत नाही. रस्ते,पाणी, विद्युत व्यवस्था, कचरा व्यवस्थापन केले जात नाही.
विकास निधीवरून पुन्हा वाद पेटला
२०१७ आणि २०२१ मध्ये ३२ गावे महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती. मात्र, समावेशानंतरही विकासकामे न झाल्याने उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन गावांनी महापालिकेतून बाहेर पडून स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्याची मागणी केली होती. शासनाने ती मागणी मान्य केली आणि दोन्ही गावे वेगळी केली.त्यानंतर उर्वरित गावांमधूनही नाराजीचा सूर कायम आहे.
माजी खासदार उन्मेष पाटील यांना आर्थिक गुन्हे शाखेने बजावला समन्स
24 तासात चौकशीसाठी हजर राहण्याचे उन्मेष पाटलांना आदेश
देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या 5 कोटी 33 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये दाखल गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेचे चौकशीसाठी हजर राहण्याच्या आदेश
नगरपालिका निवडणुकांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याच्या अडचणीत वाढ झाल्याने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
कंपनीत माझा कुठलाही भाग बसताना, माझ्यावर राजकीय देशातून गुन्हा दाखल
पार्थ पवार गिरीश महाजन यांच्यावर भूखंडा संदर्भात आरोप असतानाही त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही
शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न
- नव्या निर्णयानुसार 29 महानगरपालिकांसाठी प्रारूप मतदार यादी 14 नोव्हेंबर ऐवजी 20 नोव्हेंबरला केली जाणार प्रसिद्ध
- या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर असणार
- 27 नोव्हेंबर पर्यंत दाखल हरकतींवर निर्णय घेऊन प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी पाच डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येतील
- 8 डिसेंबर रोजी या याद्या मतदार केंद्राच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येतील 12 डिसेंबर रोजी केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार.
वाशिम जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायत निवडणूकीसाठी नामांकन दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी सदस्य पदासाठी 19 नामांकन अर्ज दाखल केले असून, यात अध्यक्ष पदासाठी केवळ 2 नामांकन दाखल करण्यात आले आहेत. यात सदस्य पदासाठी सर्वाधिक अर्ज हे वाशीम नगर परिषदेकरीता आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रिसोड नगर परिषदेमध्ये 6 नामांकन दाखल करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये खोडा घालण्याचे काम तटकरे कुटुंबीय करत आहेत असा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. जिल्ह्यात आमची ताकद जास्त आहे त्यांनी जो प्रयोग केलाय त्यापेक्षा चांगला प्रयोग आम्ही करू शकतो असा सूचक इशाराही आमदार दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपला दिला आहे. रायगड जिल्ह्यात नगर पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांना बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने युती करण्याची भूमिका घेतली आहे त्यावर ते बोलत होते. राष्ट्रवादीला सोबत घेऊन जाण्याची भूमिका नेहमीच भाजपची राहिली आहे. आम्ही जर कुणाबरोबर गेलो तर बाकीच्यांनी त्यावर विचार करू नये. आम्ही सुद्धा असे प्रयोग करू शकतो परंतु आम्ही युतीचा सन्मान ठेवून जाण्याचा प्रयत्न करत आहोत असं महेंद्र दळवी म्हणाले.
पुण्यातील नवले पूल अपघातात ८ जणांना मृत्यू
मृत्युमुखी पडलेल्या ८ जणांपैकी ५ पुरुष २ महिला आणि १ लहान मुलीचा समावेश
अपघातात १५ जणं जखमी असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू
फॉरेन्सिक पथकाकडून अपघातस्थळाची पाहणी आणि पंचनामा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.