Maharashtra Live News Update: Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : १ मे महाराष्ट्र दिवस, राज्यात ऑटो-टॅक्सी चालकाला मराठी सक्ती, मिसिंग लिंकला आजपासून सुरूवात, विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

सांगली... पाण्यासाठी शेतकऱ्यांचा सामुदायिक आत्मदहनाचा इशारा

सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आंधळी येथील शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे,एक महिन्यांपासून आंधळी सह पाच गावांना आरफळ योजनेचे पाणी मिळत नसल्याने दक्षिण आरफळ कॅनॉल कोरडा ठाक पडला आहे.परिणामी आंधळी गावासह आसपासची हजारो एकर शेती वाळू लागलेली आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, शेती वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे,मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी थेट आत्मदहनाची भूमिका घेतली आहे,येत्या दोन ते तीन दिवसात दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये पाणी न सोडल्यास पलूस तहसील कार्यालयासमोर सामुदायिक आत्मदहन करू असा इशारा दिला आहे.

रुग्णवाहिके अभावी गंभीर रुग्णांची फरफट

नॅशनल ॲम्बुलन्स सर्विस( NAS) या राज्य सरकारच्या रुग्णवाहिका सेवेच्या चालकांचा गेल्या तीन ते चार महिन्यापासून संप सुरू असल्याने बुलढाणा जिल्ह्यातील 90% रुग्णवाहिका या चालका विना धुळखात उभ्या आहेत. याचा फटका आज मोताळा तालुक्यातील सारोळा पीर येथील गणेश किसन गावंडे या अत्यवस्थ रुग्णाला बसला.

हडपसर स्थानकावर उद्घाटन बनारस-पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसचे स्वागत

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने २९ एप्रिल २०२६ रोजी हडपसर रेल्वे स्थानकावर उद्घाटन बनारस-पुणे (हडपसर) अमृत भारत एक्सप्रेसच्या स्वागत समारंभाचे आयोजन केले.

या अमृत भारत एक्सप्रेस सेवेच्या प्रारंभाने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यातील रेल्वे संपर्क अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे, ज्यामुळे प्रवाशांना प्रवासाची अधिक सोय आणि सुधारित कनेक्टिव्हिटी मिळेल.

भोंदू अशोक खरातला आज पुन्हा न्यायालयात व्हिसी द्वारे करणार हजर

- आर्थिक फसवणुकीच्या नवव्या गुन्ह्यात अशोक खरातला SIT ने घेतले आहे ताब्यात

- पुण्याच्या बिल्डरकडून तब्बल ५ कोटींची खंडणी वसुली प्रकरणात अशोक खरात SIT च्या ताब्यात

- फसवणूक आणि जादूटोण्याच्या माध्यमातून खंडणीचा खरातवर आरोप

- मृत्यूची भीती दाखवत बिल्डरला गंडवल्याचा आरोप

- “आशीर्वाद” आणि “नकारात्मक ऊर्जा”च्या नावाखाली खरातने उकळले होते कोट्यवधी रुपये

रत्नागिरी - संगमेश्वर एसटी स्टॅन्ड परिसरात वाहतुक कोंडी

संगमेश्वर एसटी स्टॅन्डकडून मुंबईच्या दिशेकडे 2 ते 3 किलोमीटरची रांग

पुलाचे सुरु असलेले काम आणि एकेरी वाहतूक सुरु असल्याने होतेय वाहतूक कोंडी

चवदार तळे जलशुद्धीकरण कामाला सुरुवात

आंबेडकरी अनुयायांना आता चवदार तळ्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे. समाज कल्याण विभागामार्फत 55 कोटी रूपयांच्या कामाला मंजुरी मिळाली असून या कामाला प्रारंभ झाला आहे. रायगडच्या महाड शहरातील चवदार तळ्याचे पाणी प्राशन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहाला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभुमीवर चवदार तळ्याचे पाणी पिण्यायोग्य शुद्धी करण्याचे काम केले जात आहे. यासाठी चवदार तळ्याचा तळ्यातील गाळ उपसरणे, बाग तयार करणे, रस्ते आदी काम केली जाणार आहेत. अमृतसरच्या धरतीवर पाणी शुध्दीकरणाचे हे काम केले जाणार असून आता चवदार तळे पहाण्यासाठी येणाऱ्या पर्यटक तसेच आंबेडकरी अनुयायांनी चवदार तळ्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे.

पुण्यातील कोथरूड, वारजेतील पाणी पुरवठा आज बंद

खडकवासला ते वारजे दरम्यान येणाऱ्या १६०० मिमी व्यासाची जलवाहिनीतून वारजे स्मशानभूमिजवळ अचानक गळती सुरू झाल्याने कोथरूड, कर्वेनगर, वारजे, बावधन, पाषाण, सुस, बाणेर, बालेवाडी, बोपोडी आदी परिसरात पाणी पुरवठा आज बंद राहाणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने दिली आहे.

मलनि:सारण विभागातर्फे जायका प्रकल्पाचे काम सुरू असताना जलवाहिनीला धक्का लागल्याने जलवाहिनी खराब झाली आहे. जलवाहिनीतून मोठ्या प्रमाणात गळती लागल्यामुळे शहराच्या पश्चिम भागातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईतुन कोकणात जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. महाराष्ट्र दिन आणि सलग तीन दिवस सुट्टयांमुळे मुंबईकर पर्यटनासाठी कोकणात निघाल्याने महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अर्धवट असून मुख्यरस्त्या ऐवजी खराब सर्व्हीस रोडचा वापर करावा लागत आहे. यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. शिवाय बेशिस्त वाहन चालकांचा फटका देखील वाहतुकीला बसताना पहायला मिळत आहे.

पंढरपुरात आरोपींची धिंड

खुनासारख्या गंभीर कलमाच्या गुन्ह्यातून कारागृहाबाहेर सुटल्यानंतर जल्लोष करण्यार्या आरोपींची पोलिसांनी रात्री पंढरपूर शहरातून धिंड काढली.

खूनाच्या आरोपीखाली अटकेत असलेला आरोपी काही दिवसांपूर्वी तुरूंगातून बाहेर आल्यानंतर त्याची फटाक्याची आतषबाजी करत मिरवणूक काढली होती. यातून सार्वजनिक शांतता भंग व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पंढरपुरात 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Maharashtra News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात तापमान ४२° पार; उष्माघाताचा धोका वाढला

उत्तर पुणे जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हामुळे तापमान ४२ अंशांवर पोहोचले असून नागरिकांना उष्माघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आलेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! LPG सिलेंडरच्या नियमात मोठे बदल! सामान्यांना दिलासा?

HSC Result 2026 : बारावीच्या निकालाची तारीख अन् वेळ ठरली, mahahsscboard.in वर पाहा रिझल्ट

जाडी बायको असणारे पुरुष आयुष्यात सर्वाधिक आनंदी, नव्या संशोधनात नेमकं काय?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप, तब्बल ९० प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे, धक्कादायक कारण आले समोर

नवी मुंबई विमानतळ व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी जाहीर, कुणाची झाली निवड?

SCROLL FOR NEXT