jiwant-satbara-mohim.jpg saam tv
महाराष्ट्र

Satbara Utara : राज्यभरात 'जिवंत सातबारा मोहीम', वारसांची नोंद नव्यानं होणार, साताबाऱ्यावरून मृत खातेदार जाणार

Farmers in Maharashtra : मयत व्यक्तीच्या नावे जमीन असल्याने अनेकदा या जमीनीच्या व्यवहारात कायदेशीर अडचणी येतात. हेच टाळण्यासाठी आता राज्यभरात जिवंत सातबारा मोहीम सुरु होतेय. शेतकऱ्यांना कसा फायदा होईल पाहुयात या वरचा विशेष रिपोर्ट.

Tejal Nagre

अनेकदा जमीन ज्याच्या नावावर असते त्याचा मृत्यू झाल्यानंतर वारसदारांची नावं अद्यवयावत करण्यात उशीर होतो...आणि अशा मृत व्यक्तींच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या खरेदी-विक्री आणि कर्ज प्रक्रियांमध्ये अनेक अडचणी निर्माण होतात..हे टाळण्यासाठी महसूल विभागानं जिवंत सातबारा मोहीम सुरू करणार आहे. 1 एप्रिल पासून राज्यभर ही मोहीम राबवण्यात येईल..

जिवंत सातबारा मोहीम

- 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी गावात चावडी वाचन करतील.

- न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडवून गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करणार.

- 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसांना त्यांची कागदपत्रे तलाठ्यांकडे सादर करता येतील.

- स्थानिक पातळीवर चौकशी होईल

- चौकशीनंतर अधिकारी वारस ठराव ई फेरफार प्रणाली मध्ये मंजूर करतील.

- 21 ते 10 मे दरम्यान वारस फेरफार पूर्ण होईल

- त्यानंतर मंडळ अधिकारी वारस फेरफारसंदर्भात निर्णय घेून सातबारा दुरुस्त करतील

- यामुळे मयत व्यक्तीऐवजी सातबाऱ्यावर वारसाचे नाव येईल

10 मे पर्यंत राज्यभरातील सातबारा अद्ययावत करण्याचे उद्दीष्ट महसूल विभागाने ठेवले असून यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही. या मोहिमेमुळे सातबाऱ्यावरील माहिती अद्ययावत राहील तसं वारसांना कायदेशीर अडचणींना सामोरं जावं लागणार नाही. फक्त सरकारनं ठरवून दिलेल्या कालावधीत ही मोहीम योग्यप्रकारे पूर्ण व्हावी एवढीच अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी कर्जमाफसाठी शेतकऱ्यांंचं मंत्रालयाच्या बाजूला असलेल्या झाडावर चढून आंदोलन

भयंकर दुर्घटना! नव्याने बांधलेली इमारत कोसळली; ३ जणांचा मृत्यू,अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

Maharashtra Politics: मोठी बातमी! एकनाथ खडसे घरवापसी करणार? विनोद तावडेंसोबतच्या भेटीचे फोटो समोर

High Blood Pressure : पावसाळ्यात वाढतो हाय BP चा धोका, 'या' चुका करणे आताच थांबवा

चपाती की भाकरी? काय खाल्ल्याने रक्तातील साखर वेगाने वाढते?

SCROLL FOR NEXT