Heavy Rain in Maharashtra  x
महाराष्ट्र

Maharashtra : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांत शेती पिकाचे नुकसान, १४,४४,७४९ हेक्टर क्षेत्र बाधित

Heavy Rain in Maharashtra : अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यातील १४ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

Ganesh Kavade

Maharashtra News : महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांत शेतीचे, पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. राज्यातील १४,४४,७४९ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. बाधित क्षेत्राचे पंचनामे अंतिम टप्यात, शेतक-यांना तातडीने मदत देणार असल्याचे आश्वासन कृषीमंत्र्यांनी दिले आहे. पावसामुळे सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, आणि मूग या पिकांचे नुकसान झाले आहे, तर भाजीपाला, फळ पिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी आणि हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी अतिवृष्टी, पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल २९ जिल्ह्यांतील १९१ तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या काळात झालेल्या पावसामुळे ६५४ पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दि.१५ ते २० ऑगस्ट दरम्यान पडलेल्या सर्वाधिक पावसामुळे शेती पिकांचे जास्त नुकसान झाले आहे.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यात १४, लाख ३६ हजार २७६ हेक्टर क्षेत्र (३५ लाख ९० हजार ६०९ एकर) बाधित झाले आहे. त्यापैकी १० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित असलेले १२ जिल्हे आहेत.

सर्वाधिक बाधित जिल्हे:

  • नांदेड – ६,२०,५६६ हेक्टर

  • वाशीम – १,६४,५५७ हेक्टर

  • यवतमाळ – १,६४,९३२ हेक्टर

  • धाराशिव - १५०,७५३

  • बुलढाणा – ८९,७८२ हेक्टर

  • अकोला – ४३,८२८ हेक्टर

  • सोलापूर – ४७,२६६ हेक्टर

  • हिंगोली – ४०,००० हेक्टर

बाधित पिके:

सोयाबीन, मका, कापूस, उडीद, तूर, मूग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. काही ठिकाणी भाजीपाला, फळपिके, बाजरी, ऊस, कांदा, ज्वारी व हळद या पिकांनाही फटका बसला आहे.

एकूण बाधित जिल्हे:

नांदेड, वाशीम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, सोलापूर, हिंगोली, धाराशिव, परभणी, अमरावती, जळगाव, वर्धा, सांगली, अहिल्यानगर, छ. संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धुळे, जळगाव, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, रायगड व नागपूर.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सुचनेनुसार बाधित भागातील सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना योग्य ती मदत तातडीने देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

Vanraj Andekar Case: तोच महिना अन् आंदेकर टोळीने नाना पेठेतच आयुषचा गेम केला, पुण्यात रक्तरंजित थरार

HIV: एचआयव्हीच्या रुग्णांनी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत?

SCROLL FOR NEXT