Minister Pratap Sarnaik Saam tv
महाराष्ट्र

Marathi language: महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे, सराकराने दिला थेट इशारा

Minister Pratap Sarnaik Warning Auto Rickshaw Driver: मराठी भाषेच्या मुद्द्यावरून सरकारने पुन्हा एकदा अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना इशारा दिला आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे, असे स्पष्ट मत मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले.

Priya More

Summary -

  • महाराष्ट्रात मराठी भाषा रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी अनिवार्य

  • १ मेपासून नियमाची कडक अंमलबजावणी होणार

  • RTO कार्यालयांतून मराठी शिकण्यासाठी पुस्तिका वाटप केले जाणार

  • प्रवासी-चालक वाद टाळण्यासाठी सरकारकडून निर्णय घेण्यात आला

राज्यामध्ये मराठीचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी आलीच पाहिजे, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जर व्यवसाय करायचा असेल तर त्यांना मराठी भाषा बोलता येणं गरजेचे आहे असा निर्णय सरकारने घेतला. १ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. १ मे पासून राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांमध्ये पुस्तिकेचे वाटप सुरू केले जाणार आहे. परप्रांतीय आणि हिंदी भाषिक चालकांना मराठी भाषेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने हा निर्णय सरकारने घेतला आहे.

महाराष्ट्रात रिक्षा, टॅक्सी किंवा ओला-उबर असो, जर तुम्हाला राज्यात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. पिंपरी-चिंचवड बस आगाराच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मराठी आलीच पाहिजे असा इशारा दिला. त्यामुळे टॅक्सी आणि रिक्षा चालकांना मराठी शिकावीच लागेल. मराठीच्या मुद्द्यावरून सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेला मनसेने देखील पाठिंबा दिला आहे.

मराठी भाषेच्या सक्तीबाबत माहिती देताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, मराठी सक्तीचा नियम राज्य शासनाने १९८९ मध्येच केला होता. आता त्यामध्ये आवश्यक सुधारणा करण्यात आली आहे. १ मे पासून या नियमाची कडक अंमलबजावणी आणि कारवाई सुरू होणार आहे. अनेकदा प्रवासी मराठीत बोलतात आणि चालकाला मराठी समजत नाही, यातून वाद होऊन प्रकरणे पोलिसांपर्यंत पोहोचतात. हे टाळण्यासाठी चालकांना मराठी येणे अनिवार्य आहे. ज्यांना मराठी येत नाही, त्यांनी साहित्यिकांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या आधारे ती शिकावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

तर माजी आमदार बच्चू कडू यांच्या विधानपरिषदेवरील संभाव्य उमेदवारीबाबत बोलताना प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, बच्चू कडू हे सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते आहेत. शेतकरी आणि दिव्यांगांसाठी त्यांनी मोठे काम केले आहे. अशा कार्यकर्त्याला विधानपरिषदेवर संधी देण्याचा निर्णय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे घेतील. त्यांचा निर्णय आमच्या पक्षात अंतिम असतो आणि त्यात काहीही चुकीचे नाही. असही सरनाईक म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dapoli Tourism : समुद्राच्या लाटांसोबत शांततेचा आनंद, दापोलीतील 'हे' ५ समुद्रकिनारे विकेंडसाठी परफेक्ट डेस्टिनेशन

Maharashtra News Live Update: थकीत ऊस बिलासाठी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक...

Chanakya Niti: ...अशा लोकांना घरी बोलवणं पडेल महागात, व्हाल बर्बाद

11th Online Admission: अकरावी ऑनलाइन प्रवेश पोर्टल अचानक ठप्प; नेमकं काय घडलं?

Crime News: लग्नाच्या २५ दिवसांनी पत्नीनं गळफास घेतला, नैराश्यात पतीनंही जीवनयात्रा संपवली, जोडप्याच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT