Maharashtra Government Announcements  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Government Yojana: 1 रुपयात पीकविमा, वर्षाला मिळणार 6 हजार रुपये! राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2 मोठ्या योजना

Maharashtra Government Nirnay : मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये या दोन घोषणा केल्या होत्या.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

Maharashtra Government Announcements : शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. राज्य सरकारने (Shinde-Fadnavis government) शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजना (Namo Shetkari Samman Nidhi Yojana) आणि 1 रुपयात पीकविमा (Crop insurance in 1 rupee) अशा दोन योजनांची घोषणा केली आहे.

मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजेटमध्ये या दोन घोषणा केल्या होत्या. या दोन्ही योजानंना आता मंजुरी मिळाली आहे.

काय आहे 'नमो शेतकरी सन्मान योजना'?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव असलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान योजने’च्या (NSSY) प्रस्तावाला मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्याती ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेनंतर्गत शेतकऱ्यांना किमान वर्षाला 6 हजार रुपायांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाला केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे एकूण 12000 हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. (Breaking News)

शेतकऱ्यांना १ रुपयात मिळणार पीक विमा

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैटकीत राज्यातील शेतकऱ्यांना १ रुपयांत पिक विमा देण्याच्या प्रस्तावाला देखील मंजुरी मिळाली आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता केवळ १ रुपयांत पिक विमा मिळणार आहे. याची उर्वरित रक्कमेचा हप्ता आता राज्य सरकार भरणार असल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प २०२३ मध्ये केली होती. यासाठी अंदाजे ३,३१२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचंही त्यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते. (Latest Political News)

कोणाला होणार फायदा?

राज्यात होणारा अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी हा या योजनेमागचा हेतू आहे. या योजनेच्या माध्यमातून पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती अथवा किड, रोगामुळे होणारे नुकसान, पूर, दुष्काळ इत्यादीमुळे ५० टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्यास आणि पीक काढणीनंतर नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान झाल्यास पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार येणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT