Sadabhau Khot on Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'शरद पवारांनी आकाशतही राज्य केलं असतं, मविआ कौरवांची फौज..', सदाभाऊ खोत यांचे टीकास्त्र

Maharashtra Assembly Election 2024: येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पवारांचे विचार राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, यावर्षी निवडणूक म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध आहे.. असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

Gangappa Pujari

अमर घटारे, अमरावती: शरद पवार यांनी या राज्यातील डावी चळवळ संपवली, कम्युनिस्ट संपवला, वेगवेगळ्या संघटना संपवल्या, महाराष्ट्रात जो गोंधळ सुरु आहे तो देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी सुरु आहे, असे म्हणत विधानपरिषदेचे आमदार आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अमरावतीमध्ये ते बोलत होते.

काय म्हणाले सदाभाऊ खोत?

"साखर कारखानदारी ही बारामतीच्या ताब्यात आहे. शरद पवार म्हणजे अलीबाबा, शरद पवारांएवढे एवढा पापी या जगात कोणी नाही. त्यांना मानावे लागेल, आकाश खाता येत नाही म्हणून त्यांनी शिल्लक ठेवलं आहे. नाहीतर शरद पवार यांनी आकाशात सुद्धा राज्य केलं असतं. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर दूरदृष्टी असलेला नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्रात जो गोंधळ सुरू आहे तो देवेंद्र फडणवीस यांना संपवण्यासाठी सुरू आहे," असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केला.

"शरद पवार यांनी या राज्यातील डावी चळवळ संपवली, कम्युनिस्ट संपवला, वेगवेगळ्या संघटना संपवल्या. या पवारांनी महाराष्ट्रातील काँग्रेस पक्ष संपवला. पण या महाराष्ट्रातून शरद पवार यांना एकच माणूस संपवता येत नाहीये. त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस, त्यांना संपवता येत नाही म्हणून शरद पवार महाराष्ट्रात आग लावत सुटले आहेत. येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्राची जनता पवारांचे विचार राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही, यावर्षी निवडणूक म्हणजे कौरव आणि पांडव यांच्यातील युद्ध आहे.." असेही सदाभाऊ खोत म्हणाले.

"एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पांडवांची फौज या निवडणुकीत उभी राहणार आहे. तर दुसऱ्या बाजूला शरद यांच्यासारख्या रावणाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कौरवांची फौज उभी राहणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या लुटारूंना गाडावे लागेल. भारतीय जनता पार्टी मधल्या अमुक-मुख्याने विश्वासघात केला असं उद्धव ठाकरे म्हणत आहेत. सत्तेच्या लालसेसाठी तुम्ही तत्त्वांना तिलांजली दिली. वसंतदादांच्या पाठीत ज्यांनी खंजीर खुपसला त्या पवारांना सोबत घेऊन तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला. या निवडणुकीत मविआला गाडावे लागेल," अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

SCROLL FOR NEXT