मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. त्यानंतर दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीनं निकालाची गुणपत्रिका विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीनं निकाल पाहता येतील, असं मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलेलं. तर आता ११वीच्या प्रवेश प्रक्रियेची लगबग सुरु होईल. तर सर्व विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे, ११वीची प्रवेश प्रक्रिया सोमवारपासून म्हणजेच १९ मे २०२५ पासून सुरु होणार आहे. त्यामुळे सगळ्या पालकांनी आपापल्या पाल्यांचे कागदपत्र जोडायला सुरुवात करायची आहे.
यंदा राज्याचा दहावीचा निकाल ९४.१० टक्के लागला आहे. यंदाही कोकण विभाग अव्वल असून यंदा दहावीच्या निकालात नागपूर विभाग तळाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी निकालात बाजी मारली असून उत्तीर्ण झालेल्यी मुलींची टक्केवारी ९६.१४ अशी आहे, तर मुलांची टक्केवारी ९२.२१ अशी आहे.
एकूण ९ विभाग निहाय निकाल
पुणे - ९४.८१ टक्के
नागपूर - ९०.७८ टक्के
संभाजीनगर - ९२.८२ टक्के
मुंबई - ९५.८४ टक्के
कोल्हापूर - ९६.७८ टक्के
अमरावती - ९२.९५ टक्के
नाशिक - ९३.०४
लातूर - ९२.७७
कोकण - ९९.८२
निकालाची वैशिष्ट्ये
- एकूण ६३ विषय त्यापैकी २४ विषयांचा निकाल १०० टक्के
- २३ हजार ४८९ शाळांपैकी ७ हजार ९२४ शाळांचा निकाल १०० टक्के
- १०० टक्के निकाल २०० विद्यार्थी
१०० टक्के मिळालेले विद्यार्थी २११
पुणे -१३
नागपूर-३
संभाजीनगर-४०
मुंबई-८
कोल्हापूर-१२
अमरावती-११
नाशिक-२
लातूर-११३
कोकण-९
राज्यातील २८५ विद्यार्थी काठावर पास
पुणे -५९
नागपूर-६३
संभाजीनगर-२६
मुंबई-६७
कोल्हापूर-१३
अमरावती-२८
नाशिक-९
लातूर-१८
कोकण-०
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.