Latur Farmer Ended Life:  Saamtv
महाराष्ट्र

Latur News: हाता तोंडाशी आलेला घास पाण्यात गेला, ५५ वर्षीय शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं; लातुरमधील दुर्दैवी घटना!

Latur Farmer Ended Life: मागील चार दिवसाखाली लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं प्रचंड मोठ नुकसान झाल आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.

Gangappa Pujari

संदीप भोसले, लातूर|ता. २८ सप्टेंबर

Latur Farmer Death News: गेल्या आठवडाभरापासून राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. विदर्भ, मराठवाड्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून हाता तोंडाशी आलेले पीक मातीमोल झालं आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका लातूर जिल्ह्याला बसला असून सोयाबीनचे मोठे नुकसान झालं आहे. अशातच हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावल्याने शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना समोर आलं आहे.

यंदा राज्यभरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. पेरण्या देखील वेळेवर झाल्याने बळीराजा सुखावला होता. मात्र मागील चार दिवसाखाली लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांचं प्रचंड मोठ नुकसान झाल आहे. अनेक शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, त्यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. अशातच लातूरच्या निलंगा तालुक्यातील चांदोरी येथील शेतकरी प्रभू गाडीकर (वय 55 वर्ष) या अल्पभूधारक शेतकऱ्यांने स्वतःच्याच गोठ्यात गळफास घेत आपले जीवन संपवले आहे.

सततची होणारी नापिकी त्यात केवळ दीड एकर शेती, स्वतःचा मुलगा दुसऱ्याच्या शेतात शेतमजूर.. या सगळ्या संकटावर मात करत कुटुंबाचा गाडा चालवायचा कसा,, या विवंचनेत त्यांनी हा टोकाचा पाऊल उचलायची माहीत समोर येत आहे. प्रभू गाडीकर यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांना शासनाने मदत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे काढणीला आलेल्या मका, कापूस, सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. सलग चार दिवस पावसाने झोडपले होते. आजही जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. गंगापूर तालुक्यातील कायगाव परिसरात सतत होत असलेल्या अतिवृष्टी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे.सध्या वेचणी आलेला कापूस पावसाने भिजल्याने त्याच्या वाती होऊन माती झाली आहे. शेत शिवार जलमय झाली आहेत, सर्वत्र पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malpua Recipe: सण-उत्सवासाठी घरच्या घरी मऊसर आणि रसाळ मालपुवा कसा बनवायचा? वाचा स्टेप बाय स्टेप रेसिपी

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT