Latur Rain: लातूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, काँग्रेस आमदारांची मागणी

Latur News: लातूरमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
लातूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Latur NewsSaam Tv
Published On

लातूर जिल्ह्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुरुड (ता. लातूर) येथे मंगळवारी ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने काढणीला आलेले सोयाबीन पीक पावसात भिजल्याने शेतकऱ्यांवर संकट आलं आहे. तसेच अनेकांच्या घरांचे, दुकानांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन नागरिकांना मदत करावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली आहे. त्यांनी पत्राद्वारे जिल्हा प्रशासनाकडे ही मागणी केली आहे.

आमदार धिरज देशमुख यांनी मुरुड इथे जाऊन नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रशासनाकडे त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वसन शेतकरी आणि स्थानिक नागरिकांना दिलं.

लातूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Beed News: धो-धो पावसापासून वाचण्यासाठी निवाऱ्याला गेले अन् घात झाला, वीज कोसळून जीवलग मित्रांचा मृत्यू

दरम्यान, मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास मुरुड येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अचानक पूराची स्थिती निर्माण झाल्याने पूराचे पाणी नागरिकांच्या घरात, बाजारपेठेतील दुकानांमध्ये गेल्याने संसारोपयोगी साहित्य तसेच दुकानांमधील साहित्याचे मोठे नुकसान झाले. यानंतर आमदार धिरज देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचवून नुकसानीची पाहणी केली.

देशमुख यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून त्वरित पंचनामे करण्याची मागणी केली. पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे देखील मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रशासनाने महसूल आणि विमा कंपन्यांना सूचित करुन आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा द्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

लातूरमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, जनजीवन विस्कळीत; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
Manjra Dam : तीन जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण ओव्हरफ्लो; पाण्याची चिंता मिटली

अतिवृष्टीमुळे शेतकरी कोलमडला आहे. त्यात पुन्हा शासनाने दप्तर दिरंगाई केल्यास त्यांचे अधिक नुकसान होईल. त्यामुळे महसूल प्रशासन आणि विमा कंपन्यांनी अडवणूक न करता त्वरित पंचनामे करावेत, असेही आमदार धिरज देशमुख यांनी म्हटले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com