Udgir Water Scarcity Saam tv
महाराष्ट्र

Water Scarcity : अवलकोंडा तलावात पुढील आठ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा; उदगीर परिसरात पाणीटंचाईची गंभीर समस्या

Latur News : राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, धरणात पाणी साचले नाही. धरणात असलेला पाणी साठा वाढत्या उन्हामुळे देखील बाष्पीभवन होऊन कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

संदीप नागरे

लातूर : राज्यातील बहुतांश भागात यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने पाणी टंचाईची भाषण समस्या निर्माण झाली आहे. आता (Latur) लातूरच्या उदगीर तालुक्यातील अवलकोंडा तलावात देखील पुढील आठ दिवस पुरेल इतकाच जिवंत पाणी साठा शिल्लक राहिला आहे. यामुळे पुढील काही दिवसात या भागात देखील पाणी टंचाईची (Water Scarcity) समस्या भेळसावणार आहे. (Maharashtra News)

राज्यात यंदा सरासरीपेक्षा कमी (Rain) पाऊस झाला आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, धरणात पाणी साचले नाही. धरणात असलेला पाणी साठा वाढत्या उन्हामुळे देखील बाष्पीभवन होऊन कमी होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे बहुतांश भागात मार्च महिन्यातच पाण्याची समस्या (Water Crisis) जाणविण्यास सुरवात झाली आहे. यानंतर आता (Udgir) उदगीर तालुक्यात देखील पाणी टंचाईचे संकट उभे आहे. अवलकोंडा तलावातील पाणीसाठा कमी होत असल्याने ही समस्या निर्माण होत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाकडे दुर्लक्ष

दरम्यान तलावात पाणीसाठा कमी असताना देखील तलावातील पाणी मोटारीने उपसा केल्याने तलाव कोरडा होत चालला आहे. यामुळे येत्या काळात नागरिकांना व जनावरांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी पाणी आरक्षित ठेवण्याचे आदेश काढले आहेत. मात्र स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तलाव कोरडा होत चालला आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

त्र्यंबकेश्वर हादरलं! विद्यार्थी 3 दिवसांपासून बेपत्ता; सगळीकडे शोधाशोध, शाळेच्या मागच्या बाजूस पाहताच... नाशिकमध्ये काय घडलं?

Shocking: पुणे हादरले! कुत्र्यांच्या टोळीचा हल्ला, शरीराचे लचके तोडत जागीच संपवलं; थरकाप उडवणारा VIDEO

Maharashtra Live News Update: केडीएमसी महासभेत सभागृह नेते पदी वरूण पाटील यांची निवड

SCROLL FOR NEXT