Kolhapur Flood  Saam Tv
महाराष्ट्र

Kolhapur Flood: पुण्यानंतर कोल्हापूरात भीषण पूरस्थिती, पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली, अनेक गावांचा पूराचा वेढा

Priya More

रणजीत माजगावर, कोल्हापूर

कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्याच नद्यांचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ४४ फूट इतकी आहे. कोल्हापूरची पंचगंगा नदी (Panchaganga River) धोक्याच्या पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची मछिंद्री झाली आहे. आता मछिंद्री झाली म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. मच्छिंद्र म्हणजे पंचगंगेच्या महापुराची उच्चत्तम पातळी मोजण्याची स्थिती आहे.

पंचगंगा नदीवर १८७८ साली बांधण्यात आलेला शिवाजी पूल आहे. सध्या नवीन पूल बांधल्यामुळे हा जुना पूल वापरला जात नाही. या पुलाला ५ दगडी कमानी आहेत. या कमानी ज्या दगडी पिलरवर उभ्या केल्या आहेत. तिथं बांधकामालाच माशाच्या शरीरासारखा निमुळता आकार आहे. या ठिकाणापर्यंत पुराचे पाणी पोहोचले किंवा या माशासारख्या निमुळत्या आकाराच्या पुलाच्या दगडावरून पंचगंगेच्या पुराचे पाणी वाहू लागले की मच्छिंद्र झाली असे समजतात. पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हते तरीही मच्छिंद्र झाली. मच्छिंद्र झाली अशी वार्ता करत कोल्हापुरात पूर आल्याचे संकेत दिले जात होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे शिरोळ तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खिद्रापूर, राजापूर , राजापूर वाडी गावातील नागरिकांनी कुटुंबासह जनावरे स्थलांतरित करण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी शिरोळ तालुक्याला पुराचा मोठा फटका बसतो. यावेळी देखील शिरोळा तालुक्याला पूराचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाने कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडोलीतील घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे जीर्ण होऊन घराची भिंत कोसळली. कोल्हापूर जिल्ह्यातील ९५ बंधारे पाण्याखाली गेले असून ११ राज्य, ३७ प्रमुख जिल्हा मार्ग पूरामुळे बंद झाले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, कोल्हापूरच्या पूरग्रस्तांच्या बाबत सरकारला गांभीर्य नाही. आम्ही सांगितल्यानंतर पूर नियोजनाची बैठक प्रशासनाने घेतली. अद्यापही पूरग्रस्तांना मदत सरकारने दिली नसून यामध्ये राजकारण केले जाते की काय अशी शंका असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केलाय. शिवाय केंद्र सरकारही महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असून एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना भेटून अलमाटी मधून पाणी सोडण्यास सांगितले नसतं तर कोल्हापूर अर्ध पाण्यात बुडाल असतं असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आज कोल्हापुरात पूरग्रस्त भागाची पाहणी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी केल्यानंतर माध्यमांशी बोलताा त्यांनी सरकारवर टीका केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : आज 'या' 5 राशींवर होणार गणरायाची कृपा, मिळणार गोड बातमी

Kalyan Crime : धक्कादायक! दिव्यांग दाम्पत्याच्या बाळाला विकण्याचा प्रकार; डॉक्टरचं कृत्य उघडकीस, कल्याणमधील खळबळजनक घटना

Manoj Jarange Patil: 'आरक्षण न दिल्यास फडणवीस जबाबदार' विधानसभा तोंडावर जरांगेंचा सहाव्यांदा उपोषणाचा एल्गार

Fact Check : डीजेमुळे फाटल्या व्यक्तीच्या मेंदूच्या नसा? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांचं ठरलं, स्ट्राईकरेटवर अडलं? शिंदेंचा फॉर्म्युला भाजप, अजित पवार गट स्वीकारणार? वाचा...

SCROLL FOR NEXT