kolhapur News central government Give GI certificate to 32 artisans making Kolhapuri chappals Saam TV
महाराष्ट्र

Kolhapuri Chapppal Special Report: कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्या ३२ कारागिरांना GI प्रमाणपत्र; राष्ट्रीय स्तरावर मान्यता

साम टिव्ही ब्युरो

रणजीत माजगावकर साम टीव्ही

Kolhapuri Chapppal Special Report: कोल्हापूर म्हटलं की प्रत्येक पर्यटकाला आकर्षण असतं ते कोल्हापुरी चप्पलचे. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला आलेला प्रत्येक पर्यटक हा कोल्हापुरी चप्पल घेतल्या शिवाय माघारी जात नाही. पारंपरिक पद्धतीने कोल्हापूर चप्पल बनवणाऱ्या तब्बल 32 कारागिरांना केंद्र सरकारच्या वतीने जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे कोल्हापुरी चपलेला आता सुवर्ण जळाली प्राप्त झाली आहे. (Latest Marathi News)

कोल्हापुरी चप्पल हे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरलेलं आहे. शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या या कोल्हापुरी चपलांनी कार टू कार्पेट असा प्रवास केलेला आहे. केंद्र सरकारच्या हस्तकला विकास आयुक्त यांच्या कार्यालयातर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील ३२ कारागिरांना जीआय प्रमाणपत्र मिळाले आहे. हे सर्व कारागीर कोल्हापुरी चप्पल घडविणारे आहेत.

भौगोलिक स्थान निश्चितीच्या निकषानुसार कोल्हापुरी (Kolhapur) चप्पल बनविणारे शासनाने अधिकृत केलेले कारागीर म्हणून या ३२ जणांची नोंद झाली आहे. कोल्हापुरी चप्पलला राष्ट्रीय स्तरावर हस्तकलेचा उत्तम वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. जीआय मानांकनाप्रमाणे चप्पल बनवणारे कारागीर आहेत, पण त्यांची स्वतंत्र ओळख नाही.

यासाठी केंद्र सरकारच्या हस्तकला विभागाने या कारागिरांना जी.आय. प्रमाणपत्र देण्याचे निश्चित केले. याची एक प्रक्रियाही निश्चित केली. याअंतर्गत कारागीर हस्तकला विभागाकडे अर्ज करतात. अर्जाची छाननी होऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर हे प्रस्ताव चेन्नई येथील भौगोलिक उपदर्शन रजिस्ट्रीकडे पाठवले जातात. येथे प्रस्तावांची पाहणी, प्रत्यक्ष चप्पलची पाहणी केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते. यामुळे कोल्हापुरातील कारागिरांच्या कलेला शासनाची अधिकृत मान्यता मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या (Central Government) विकास आयुक्त कार्यालय यांच्या माध्यमातून कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांना हे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच कारागिरांना असे प्रमाणपत्र मिळाले असून, त्यामुळे आता त्यांच्या कलेवर शासनाची मोहर उमटली आहे. कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांची नोंदणी झाली असून, त्यांना ओळखपत्र देण्यात येत आहे.

भौगोलिक स्थान निश्चिती केलेल्या जिल्ह्यांतील पाच हजार कारागिरांना हे ओळखपत्र देण्यात येत आहे. कर्नाटक सरकारने आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त कारागिरांना जीआय प्रमाणपत्र मिळवून दिले. कोल्हापुरात मात्र पहिल्यांदाच हे प्रमाणपत्र कारागिरांना मिळाले आहे.

जी.आय मानांकनाचे फायदे काय?

जी.आय. मानांकनाप्रमाणे चप्पल बनवणारे कारागीर अधिकृत मानले जातील. भौगोलिक स्थान निश्चित केलेले क्षेत्र सोडून अन्यत्र चप्पल बनवल्यास तक्रार करण्याचा कारागिरांना अधिकार असेल. कोल्हापुरी चप्पल निर्यात करण्यासाठी जी.आय.प्रमाणपत्र उपयोगी ठरेल. याशिवाय देशाच्या अन्य भागांत शासकीय हस्तकला प्रदर्शनांमध्ये प्राधान्य मिळेल.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, कुणाला मोठा भाऊ खुमखुमी असेल तर... ठाकरे गटाचा इशारा

Mumbai Crime: मुंबईत १३ वर्षीय मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; मुलुंड परिसरातील धक्कादायक प्रकार

Jasprit Bumrah: नाद करा पण बुमराहचा कुठं.. चेंडू सोडण्याच्या प्रयत्नात बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल- VIDEO

Smell Free Shoes Tips : बुटांचा खराब वास येत आहे? या टिप्सने दुर्गंधी होईल मिनिटांत छुमंतर

Sanjay Raut Video : मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये वाद? राऊत काँग्रेसवर भडकले !

SCROLL FOR NEXT